शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

पुण्यात शेकाप नवी झेप घेईल

By admin | Updated: January 13, 2017 02:19 IST

शेतकरी कामगार पक्षात इनकमिंग होणे ही स्वागतार्ह बाब असून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नवी झेप

पुणे : शेतकरी कामगार पक्षात इनकमिंग होणे ही स्वागतार्ह बाब असून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नवी झेप घेईल. प्रत्येक गावात, शहरात पक्षाचे कार्य नेले जाईल, असे या पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे सांगितले.संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, शांताराम कुंजीर, श्रीमंत कोकाटे, अजय भोसले, सारिका भोसले, वासंती नलावडे आदी सुमारे ४५ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या पटांगणात झालेल्या शेकाप मेळाव्यात शेकापमध्ये प्रवेश केला. त्या वेळी पाटील बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, संपतराव पवार-पाटील, पक्षाचे कार्यालयीन सचिव एस. व्ही. जाधव आदी व्यासपीठावर होते. फुले पध्दतीची पगडी, घोंगडी आणि नांगराची प्रतिकृती व संविधानाची प्रत देऊन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘शेकापची स्थापना याच पुण्यात झाली होती. त्यामुळे जिजाऊ जयंतीच्या दिवशी पक्षाचा मेळावा घेण्यात आला. जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरली होती. शेकापमधून आजवर अनेक लोक गेले. लोक म्हणतात की, शेकापमध्ये कार्यकर्ते येत नाहीत. पण मी पक्षाचा सरचिटणीस असताना पक्षात नव्याने आगमन होणे हे स्वागतार्ह आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत ३ वर्षे आमच्या बैठका सुरु होत्या. गायकवाड यांच्यासारखा आक्रमक कार्यकर्ता त्यांनी आम्हाला दिला.’’गणपतराव देशमुख म्हणाले, परिवर्तनाच्या वाटचालीत हा मेळावा ऐतिहासिक आहे. प्रवीण गायकवाड यांनी  शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, महिलांवरील बलात्कार आदी मुद्दांचा ऊहापोह करत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आपली पक्ष प्रवेशामागील भूमिका सांगताना ते म्हणाले, माझे वय ४५ झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडमधून मी पदमुक्त झालो. अनेक कार्यकर्ते वेगळी भूमिका असलेल्या पक्षांमध्ये गेले. पण माझ्यासाठी शेकाप हेच योग्य व्यासपीठ असल्याने या पक्षात आलो. शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान करेन. या पुढच्या काळात शेतक-यांनी आत्महत्या केल्या तर सरकारला पळता भुई थोडी होईल, एवढे लोक घेऊन मंत्रालयात जाईन.गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोषकांचे प्रतिनिधी आहेत. राज्यातील ब्राह्मणांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा गडकरी पुतळा करु. आजच्या ऐतिहासिक घटनेनंतर राज्य सरकारचा काऊंट डाऊन सुरु झाला आहे. राहुल पोकळे म्हणाले, गडकरी पुतळा घटनेमागचा मास्टर माईंड शोधण्याविषयी मुख्यमंत्री बोलतात. त्यांना अस्मिता संभाजी महाराजांऐवजी गडकरींविषयी आहे. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड त्यांना शोधता आलेला नाही. मीनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)