शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
2
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
3
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
4
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
5
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
6
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
7
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
8
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
10
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
11
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
12
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
13
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
14
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
15
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
16
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
17
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
18
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
19
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
20
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 

पुण्यात शेकाप नवी झेप घेईल

By admin | Updated: January 13, 2017 02:19 IST

शेतकरी कामगार पक्षात इनकमिंग होणे ही स्वागतार्ह बाब असून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नवी झेप

पुणे : शेतकरी कामगार पक्षात इनकमिंग होणे ही स्वागतार्ह बाब असून प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष नवी झेप घेईल. प्रत्येक गावात, शहरात पक्षाचे कार्य नेले जाईल, असे या पक्षाचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी येथे सांगितले.संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड, राहुल पोकळे, शांताराम कुंजीर, श्रीमंत कोकाटे, अजय भोसले, सारिका भोसले, वासंती नलावडे आदी सुमारे ४५ पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या पटांगणात झालेल्या शेकाप मेळाव्यात शेकापमध्ये प्रवेश केला. त्या वेळी पाटील बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, आमदार धैर्यशील पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, संपतराव पवार-पाटील, पक्षाचे कार्यालयीन सचिव एस. व्ही. जाधव आदी व्यासपीठावर होते. फुले पध्दतीची पगडी, घोंगडी आणि नांगराची प्रतिकृती व संविधानाची प्रत देऊन गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पाटील म्हणाले, ‘‘शेकापची स्थापना याच पुण्यात झाली होती. त्यामुळे जिजाऊ जयंतीच्या दिवशी पक्षाचा मेळावा घेण्यात आला. जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने पुण्याची भूमी नांगरली होती. शेकापमधून आजवर अनेक लोक गेले. लोक म्हणतात की, शेकापमध्ये कार्यकर्ते येत नाहीत. पण मी पक्षाचा सरचिटणीस असताना पक्षात नव्याने आगमन होणे हे स्वागतार्ह आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत ३ वर्षे आमच्या बैठका सुरु होत्या. गायकवाड यांच्यासारखा आक्रमक कार्यकर्ता त्यांनी आम्हाला दिला.’’गणपतराव देशमुख म्हणाले, परिवर्तनाच्या वाटचालीत हा मेळावा ऐतिहासिक आहे. प्रवीण गायकवाड यांनी  शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, महिलांवरील बलात्कार आदी मुद्दांचा ऊहापोह करत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आपली पक्ष प्रवेशामागील भूमिका सांगताना ते म्हणाले, माझे वय ४५ झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडमधून मी पदमुक्त झालो. अनेक कार्यकर्ते वेगळी भूमिका असलेल्या पक्षांमध्ये गेले. पण माझ्यासाठी शेकाप हेच योग्य व्यासपीठ असल्याने या पक्षात आलो. शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी जीवाचे रान करेन. या पुढच्या काळात शेतक-यांनी आत्महत्या केल्या तर सरकारला पळता भुई थोडी होईल, एवढे लोक घेऊन मंत्रालयात जाईन.गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोषकांचे प्रतिनिधी आहेत. राज्यातील ब्राह्मणांची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांचा गडकरी पुतळा करु. आजच्या ऐतिहासिक घटनेनंतर राज्य सरकारचा काऊंट डाऊन सुरु झाला आहे. राहुल पोकळे म्हणाले, गडकरी पुतळा घटनेमागचा मास्टर माईंड शोधण्याविषयी मुख्यमंत्री बोलतात. त्यांना अस्मिता संभाजी महाराजांऐवजी गडकरींविषयी आहे. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमागील मास्टर माईंड त्यांना शोधता आलेला नाही. मीनाक्षी पाटील, धैर्यशील पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर आदींची भाषणे झाली. (वार्ताहर)