शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

मंजूर प्रक्रियेलाच वर्षाचा कालावधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्य सरकारच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सरकारनेच विमा कंपनीवर आणखी एक सल्लागार कंपनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्य सरकारच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सरकारनेच विमा कंपनीवर आणखी एक सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा त्याच्या नातेवाइकास विम्याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास वर्षापेक्षाही जास्त कालावधी लागतो आहे.

जमिनीच्या सातबाऱ्यावर शेतकरी म्हणून नोंद असलेल्या प्रत्येकाला व त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला हा अपघात विमा लागू होतो. १० वर्षे ते ७५ वर्षे वयापर्यंतचा खातेदार योजनेत पात्र आहे. त्याचा विमा हप्ता (प्रत्येकी ३२ रुपये २३ पैसे) सरकार जमा करते. वर्षभर व त्यानंतर पुढे ३ महिने कागदपत्रे पूर्ततेसाठी म्हणून असा या योजनेचा कालावधी आहे.

दिवसाच्या २४ तासांत कुठेही रस्त्यावर अपघात झाला तरी अपघातग्रस्त शेतकरी योजनेस पात्र होतो. याशिवाय सर्पदंश, उंचावरून पडून, पाण्यात बुडून अपघात झाला तरी पात्र आहे. मृत्यू किंवा कोणतेही दोन अवयव जायबंदी झाले तर २ लाख व एकच अवयव जायबंदी झाला तर १ लाख रुपये विमा कंपनीकडून मिळतात.

त्यासाठी अपघातग्रस्त शेतकरी किंवा तो नसेल तर नातेवाईकांनी तालुका कृषी विभागात विहीत नमून्यात अर्ज करावा लागतो. त्याला अपघाताचा प्रथम माहिती अहवाल जोडावा लागतो. त्यानंतर तालुका कृषी विभागाकडे अर्ज दाखल करायचा, त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची मागणी होते. प्रकरण पूर्ण झाले की ते सल्लागार कंपनीकडे सादर होते. त्यांच्याकडून पुन्हा छाननी होते व त्यानंतर ते त्यांच्याकडूनच विमा कंपनीकडे दाखल होते. विमा कंपनीकडे प्रकरण दाखल झाल्यावर त्यांनी त्यावर २१ दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक आहे.

त्यांच्याकडून, सल्लागार कंपनीकडून, कृषी विभागाकडून प्रकरणांमध्ये त्रुटी निघतात. त्या जन्मतारखेच्या दाखल्यापासून ते पोलीस पंचनाम्याच्या कागदपत्रांपर्यंतच्या असतात. त्याची पूर्तता करावीच लागते. अन्यथा विमा नाकारला जातो.

जिल्ह्यातील खातेदारांची संख्या

जिल्ह्यातील खातेदारांची संख्या- ८ लाख ५० हजार

सन २०१९-२० मध्ये दाखल विमा प्रकरणे- २२५

मंजूर प्रकरणे- ३६

प्रक्रियेत असलेली प्रकरणे- १२८

त्रुटी असलेली प्रकरणे- ४६

नामंजूर झालेली प्रकरणे- १५

प्रकरणांची अपघातनिहाय संख्या

रस्ता अपघात-१२९

सर्पदंश- २०

पाण्यात बुडून - २५

इतर (उंचावरून पडून वगैरे)- ५१

चौकट

प्रकरण नाकारल्याची कारणे

-वाहन चालवण्याचा परवाना नाही

-वाहन वेगात चालवत होते

-खातेदार असल्याचा पुरावा नीट नाही

-वय ७५ पेक्षा जास्त

चौकट

प्रकरणे मंजूर होण्यासाठी प्रयत्न

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती प्रकरणांचा आढावा घेत असते. नाकारलेल्या प्रकरणांचे प्रस्तावही आम्ही त्यांच्यापुढे ठेवतो. त्रुटी दूर करून प्रकरणे मंजूर व्हावीत यासाठी प्रयत्न केले जातात.

- प्रमोद सावंत, तंत्र अधिकारी, सांख्यिकी, कृषी विभाग