शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

पाच हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ

By admin | Updated: July 8, 2015 01:39 IST

खेड तालुक्यात २०१४-२०१५ या वर्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ३८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे,

राजगुरुनगर : खेड तालुक्यात २०१४-२०१५ या वर्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ३८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. एकूण साडेपाच हजार शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत प्रामुख्याने कृषी खात्याच्या वतीने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक-कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरविला होता. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आणि जेव्हा झाला तेव्हा अवकाळी झाल्याने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण बहुतांश भात उत्पादकांनी विमा घेतला असल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. भात पिकाला मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३४ लाख आहे. इतर पिकांना त्या तुलनेत कमी नुकसानभरपाई मिळाली. गेल्या वर्षी एकूण १७ लाख ६५ हजार रुपये विम्याच्या हप्त्यापोटी भरले गेले होते. भाताला हेक्टरी १५ हजार ४०० रुपये विमा संरक्षण होते, तर हेक्टरी ३८५ रुपये विम्याचा हप्ता होता. प्रत्येक पिकाला वेगवेगळी विमा संरक्षण रक्कम असते. (वार्ताहर)स