शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मतदानाचा वाढला टक्का

By admin | Updated: October 16, 2014 05:57 IST

विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदारराजाने मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून विविध मतदान केंद्रांत मतदारांनी रांगा लावून मतदान केले. भर उन्हातदेखील मतदारांचा उत्साह कायम होता. जिल्ह्यात सरासरी ६२.५ टक्के मतदान झाले असून, गेल्या निवडणुकीपेक्षा त्यात ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता रविवारी (दि. १९) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढली असून, ३०८ उमेदवारांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे. वाढलेले मतदान नक्की प्रस्थापितांच्या विरोधात जाणार की अन्य काही पर्याय समोर येतात, याबाबत आता खल सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले होते. मतदारांनीदेखील तितक्याच उत्साहाने आपले कर्तव्य बजावून भरघोस मतदान केले. बहुतांश मतदारसंघांत पंचरंगी लढत असल्याने मतांचे धु्रवीकरण होऊन धक्कादायक निकाल हाती येतील, असे भाकीत वर्तविण्यात येत होते. तसेच, लढतीदेखील चुरशीच्या होतील, असा अंदाज होता. मात्र, मतदारांनी पुन्हा एकदा चकवा देऊन निकालाच्या अंदाजाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. गेल्या २००९च्या विधानसभा निवडणुकीत २१ मतदारसंघांची टक्केवारी ५४.४४ टक्के होती, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ५७.४२ टक्के होती. रात्री उशिरा हाती आलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान झाले होते.दरम्यान, मतदान वाढावे यासाठी मतदान केंद्रात मतदारांना नेण्यासाठी वाहने ठेवली होती. याशिवाय नातेगोते, मित्रपरिवार, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ‘आपल्या’ मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी उमेदवारांची यंत्रणा कार्यरत होती. तसेच, जिल्हा प्रशासनाचा ‘जागो मतदार’ रथही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होता. (प्रतिनिधी)