शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

विद्यापीठात वाढतोय संशोधनाचा टक्का

By admin | Updated: February 28, 2015 02:22 IST

विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या

पुणे : विद्यार्थ्यांना संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे संशोधनाचा टक्का वाढत आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये ४०५ जणांनी विविध विषयांत संशोधन करीत पीएचडी पदवी मिळविली. मागील वर्षी ही संख्या ३३० एवढी होती. विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या सोमवारी होत आहे. त्यानिमित्त शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमागील आवारात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवी प्रदान होणार आहे. यामध्ये एकूण ८८ हजार ३०६ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रदान केली जाणार आहे. त्यापैकी ४०५ पीएचडी पदवीधारक आहेत. एकूण १०० सुवर्णपदके ६१ विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.मागील काही वर्षांपासून विद्यापीठातील संशोधनामध्ये वाढ होत आहे. याविषयी बोलताना डॉ. गाडे म्हणाले, विधी, अभियांत्रिकी, वाणिज्य, औषधनिर्माणशास्त्र या विद्याशाखांमध्ये मार्गदर्शक खूप कमी होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संधी मिळत नव्हती. आता मार्गदर्शकांची संख्या वाढविली आहे. तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. हा ट्रेंड आशादायी आहे, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.