शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागाचे पालिकेला वावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 02:00 IST

शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या सोडविणे महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाच सहभाग घेऊन प्रत्येक प्रभागात

पुणे : शहरातील घनकचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. ही समस्या सोडविणे महापालिकेच्या हाताबाहेर गेल्याने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचाच सहभाग घेऊन प्रत्येक प्रभागात लोकसहभागातून कचरा समस्या सोडविली जावी या उद्देशाने महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेले लोकनेते यशवंतराव शहर स्वच्छता अभियान महापालिकेने गुंडाळले आहे.महापालिकेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी आधी महापालिका आयुक्तांनी आणि नंतर स्थायी समितीने एक दमडीही ठेवण्याची तसदी घेतली नसल्याने हे अभियान पुढील वर्षापासून बंद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. या वेळी त्यांनी राज्यात अशा प्रकारचे अभियान राबविणाऱ्या पुणे महापालिकेचे विशेष कौतुकही या कार्यक्रमात केले होते. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या धर्तीवर लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्य जन्मशताब्दी निमित्ताने २०१२मध्ये तत्कालीन महापौर वैशाली बनकर यांनी पुढाकार घेऊन हे स्वच्छता अभियान सुरू केले होते. विशेषत: शहरातील घनकचरा व्यवस्थापनात नागरी सहभाग असावा तसेच, आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवावा या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. त्यात विजेत्या ठरणाऱ्या प्रथम प्रभागास विकासासाठी तब्बल २ कोटी रुपयांचे बक्षीस, दुसऱ्या क्रमांकाच्या प्रभागासाठी दीड कोटी, तिसऱ्या क्रमांकासाठी १ कोटी तर चौथ्या क्रमांकासाठी ७५ लाख रुपयांचे बक्षीस निश्चित करण्यात आले होते. या निधीतून विजेत्या प्रभागामध्ये स्वच्छता प्रकल्प तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर उपक्रम राबविले जाणार होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी विशेष तरतूदही करण्यात येत होती. २०१५-१६ च्या अंदाजपत्रकातही या अभियानासाठी तरतूद आहे. माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात या अभियानासाठी कोणतीही तरतूद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अभियान पुढील वर्षी बंद करण्यात येणार हे निश्चित झाले आहे. > गेल्या वर्षभरात शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागाच नसल्याने शहरातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी महापालिकेकडून भर दिला जात आहे. अशा स्थितीत नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रभागांमध्येच कचरा जिरविण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. अशा स्थितीत प्रशासन तसेच स्थायी समितीकडूनही या अभियानाबाबत उदासीनता दाखविण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेकडून एका बाजूला पुणेकरांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले जात असताना; दुसरीकडे मात्र, शहराच्या स्वच्छतेसाठीचा लोकसहभाग प्रशासनास नकोसा झालेला असल्याचे समोर आले आहे. > प्रशासनाकडून स्वच्छ भारत अभियानां अंतर्गत विविध स्वच्छता उपक्रमांसाठी खर्च केला जात असल्याचे सांगितले. तसेच गेल्या वर्षात या अभियानाचे कोणतेही काम प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे तो निधी वाया गेला आहे. त्यातच महापालिका आयुक्तांनी स्वच्छभारत अभियानासाठी खर्च होत असल्याचे सांगितल्याने या अभियानासाठी निधी ठेवण्यात आलेला नाही. - अश्विनी कदम (माजी स्थायी समिती अध्यक्षा)