शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

फास्टॅग वसूल केल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : राज्यासह खेड-शिवापूर टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. शिवापूर टोलनाक्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : राज्यासह खेड-शिवापूर टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ व १४ वाहनांना दिलेली सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टोलनाका हटाव संघर्ष समितीसह आमदार संग्राम थोपटे आक्रमक झाले असून सवलत रद्द केल्यास तसेच फास्टॅग वसुली सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

स्थानिकांना टोलमधून सवलत देता येणार नसून तातडीने फास्टॅग काढून घेण्याची आवाहन टोल प्रशासनाने घेतला आहे. फास्टॅग अनिवार्य झाल्यास असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. हा टोलनाकाच बंद करण्याची मागणी होत आहे.

खेड-शिवापूर (ता. हवेली) टोलनाक्यावर मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाकडून लेखी पत्र देऊन या टोल नाक्यावर एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना टोलमधून सवलत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शिवापूर टोलनाक्यावर या वाहनांना सवलत दिली जाते. मात्र, शासनाने टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करत असल्याचे जाहीर केल्यावर या सवलतीचे काय होईल, याबाबत स्थानिक नागरिकांना प्रश्न पडला आहे. याबाबत खेड-शिवापूर टोलनाक्याचे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्याशी संपर्क साधला असता फास्टॅग हे अनिवार्य राहील. शासन आदेशानुसार स्थानिकांना जास्त दिवस आम्ही सवलत देऊ शकत नाही. तरी स्थानिकांनी मासिक २७५ रुपयांचा पास काढून टोल प्रशासनास सहकार्य करावे, अशी भूमिका मांडत स्थानिकांना टोल द्यावाच लागेल, असेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

चौकट

खेड-शिवापूर टोलसंघर्ष समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांच्याशी संपर्क साधला असता वर्षापूर्वीच्या आंदोलनात ठरलेल्या निर्णयानुसार एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना दिलेली सूट कायम राहिलीच पाहिजे, ही परिस्थिती जैसे थे राहील, असे पोलिस प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात येत आहे. मात्र, स्थानिकांकडून फास्टॅगचे कारण सांगत टोलवसुली केली गेल्यास संघर्ष समितीच्या वतीने आठवड्यात मोठे आंदोलन उभे केले जाईल व त्याची जबाबदारी सर्व प्रशासनावर राहील, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

खेड-शिवापूर टोलनाका हटवून टोलनाका पीएमआरडीच्या हद्दीच्या बाहेर नेण्यासाठी सर्वपक्षीय समितीने एकत्र येऊन लढा दिला होता. याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन टोलनाक्याबाबत निर्णय घेण्याचे सूचना एनएचआयला दिले होते. तसेच गेल्यावर्षी १६ फेब्रवारी रोजी एनएचआयने भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली या तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्याचे टोल व्यवस्थापनाने व एनएचआयने जाहीर केले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याबाबत आंदोलकांना आश्वासन दिले होते. या निर्णयास वर्षपूर्ती झाली असली तरी निर्णय होत नसून सुळे यांनी संसदेत टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित न केल्याने नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोट

खेड-शिवापूर टोलनाका तेथून हालवायचा आहे. आमची मुख्य मागणी टोल हटवणे ही आहे. त्यामुळे तो निर्णय होईपर्यंत स्थानिक कोणत्याही प्रकारे टोल देणार नाहीत व जबरदस्तीने वसुली करण्यात आल्यास संघर्ष समितीसह मोठे आंदोलन करण्यात येईल.

- आमदार, संग्राम थोपटे