शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

फास्टॅग वसूल केल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : राज्यासह खेड-शिवापूर टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. शिवापूर टोलनाक्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : राज्यासह खेड-शिवापूर टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. शिवापूर टोलनाक्यावर एमएच १२ व १४ वाहनांना दिलेली सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टोलनाका हटाव संघर्ष समितीसह आमदार संग्राम थोपटे आक्रमक झाले असून सवलत रद्द केल्यास तसेच फास्टॅग वसुली सुरू केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

स्थानिकांना टोलमधून सवलत देता येणार नसून तातडीने फास्टॅग काढून घेण्याची आवाहन टोल प्रशासनाने घेतला आहे. फास्टॅग अनिवार्य झाल्यास असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. हा टोलनाकाच बंद करण्याची मागणी होत आहे.

खेड-शिवापूर (ता. हवेली) टोलनाक्यावर मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आंदोलनानंतर टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाकडून लेखी पत्र देऊन या टोल नाक्यावर एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना टोलमधून सवलत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शिवापूर टोलनाक्यावर या वाहनांना सवलत दिली जाते. मात्र, शासनाने टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करत असल्याचे जाहीर केल्यावर या सवलतीचे काय होईल, याबाबत स्थानिक नागरिकांना प्रश्न पडला आहे. याबाबत खेड-शिवापूर टोलनाक्याचे व्यवस्थापक अमित भाटिया यांच्याशी संपर्क साधला असता फास्टॅग हे अनिवार्य राहील. शासन आदेशानुसार स्थानिकांना जास्त दिवस आम्ही सवलत देऊ शकत नाही. तरी स्थानिकांनी मासिक २७५ रुपयांचा पास काढून टोल प्रशासनास सहकार्य करावे, अशी भूमिका मांडत स्थानिकांना टोल द्यावाच लागेल, असेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

चौकट

खेड-शिवापूर टोलसंघर्ष समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर यांच्याशी संपर्क साधला असता वर्षापूर्वीच्या आंदोलनात ठरलेल्या निर्णयानुसार एमएच १२ व १४ क्रमांकाच्या वाहनांना दिलेली सूट कायम राहिलीच पाहिजे, ही परिस्थिती जैसे थे राहील, असे पोलिस प्रशासनाकडून आम्हाला सांगण्यात येत आहे. मात्र, स्थानिकांकडून फास्टॅगचे कारण सांगत टोलवसुली केली गेल्यास संघर्ष समितीच्या वतीने आठवड्यात मोठे आंदोलन उभे केले जाईल व त्याची जबाबदारी सर्व प्रशासनावर राहील, असा इशारा त्यांनी दिला.

चौकट

खेड-शिवापूर टोलनाका हटवून टोलनाका पीएमआरडीच्या हद्दीच्या बाहेर नेण्यासाठी सर्वपक्षीय समितीने एकत्र येऊन लढा दिला होता. याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेऊन टोलनाक्याबाबत निर्णय घेण्याचे सूचना एनएचआयला दिले होते. तसेच गेल्यावर्षी १६ फेब्रवारी रोजी एनएचआयने भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली या तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्याचे टोल व्यवस्थापनाने व एनएचआयने जाहीर केले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याबाबत आंदोलकांना आश्वासन दिले होते. या निर्णयास वर्षपूर्ती झाली असली तरी निर्णय होत नसून सुळे यांनी संसदेत टोलनाक्याबाबत प्रश्न उपस्थित न केल्याने नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कोट

खेड-शिवापूर टोलनाका तेथून हालवायचा आहे. आमची मुख्य मागणी टोल हटवणे ही आहे. त्यामुळे तो निर्णय होईपर्यंत स्थानिक कोणत्याही प्रकारे टोल देणार नाहीत व जबरदस्तीने वसुली करण्यात आल्यास संघर्ष समितीसह मोठे आंदोलन करण्यात येईल.

- आमदार, संग्राम थोपटे