शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

‘इनरकॉन’ला थकबाकीची नोटीस

By admin | Updated: January 8, 2015 23:05 IST

मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि त्यावरचा दंड असा सुमारे ६ कोटी रुपयांचा महसूल थकविला आहे.

राजगुरुनगर : पवनऊर्जानिर्मिती क्षेत्रातील कंपनी ‘इनरकॉन’ने खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पवनचक्कया करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) आणि त्यावरचा दंड असा सुमारे ६ कोटी रुपयांचा महसूल थकविला आहे. तो वसूल करण्यासाठी खेड तहसीलदार कार्यालयाकडून कंपनीला नोटीस दिली असल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली.खेड आणि मावळ या दोन तालुक्यांतील २८ गावांच्या हद्दीतील वनविभागाच्या मालकीच्या १९६ हेक्टर इतक्या राखीव वनक्षेत्रात तीस वर्षांच्या भाडे करारावर इनरकॉन कंपनीला पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता देण्यात आलेली होती. हा प्रकल्प २०१० मध्ये सुरू झाला होता. खेड तालुक्याच्या पश्चिम डोंगराळ भागात चाकण वनपरिक्षेत्रातील शिवे, वहागाव, खरपुड, कुडे आदी तेरा गावांच्या हद्दीतील राखीव वनक्षेत्रात पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या गावांच्या हद्दीत पवनचक्कयांची निर्मिती करण्यासाठी कंपनीने डोंगरांमधील मुरूम, दगड, माती यांचे अनधिकृतरीत्या उत्खनन केले होते. वांद्रा, वेल्हावळे, वहागाव या परिसरात शासकीय आकडेवारीनुसार १० हजार ब्रास, तर कुडा परिसरात२५ हजार ब्रास मुरूम दगड-माती यांचे अनधिकृत उत्खनन केले होते. पवनचक्कया करण्यासाठी कंपनीची जड वाहने जात असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ते करण्यात आले होते. तसेच, डोंगरावर यंत्रसामग्री नेण्यासाठी डोंगर फोडून आणि वृक्षतोड करून रस्ते तयार केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे आणि निसर्गसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. (वार्ताहर)दंडाचा आकडा वाढणारसुमारे पस्तीस हजार ब्रास इतक्या मुरूम, माती व खडकांचे उत्खनन केल्याप्रकरणी हा दंड करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात मात्र इनरकॉन कंपनीने काही लाख ब्रासचे उत्खनन केलेले आहे. त्यामुळे महसूल विभागाने यंत्रांच्या साह्याने झालेल्या उत्खननाची मोजणी केली, तर दंडाचा हा आकडा प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे महसूल विभागाने तातडीने मोजणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.