शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाऱ्याला दंड

By admin | Updated: April 29, 2016 02:05 IST

राजकीय दबावामुळे तीन वेळा रस्त्यांचे स्थान बदलून निर्दोषांची घरे पाडण्याचा २०११मध्ये घडला होता.

पिंपळे गुरव : राजकीय दबावामुळे तीन वेळा रस्त्यांचे स्थान बदलून निर्दोषांची घरे पाडण्याचा २०११मध्ये घडला होता. या संदर्भात पीडित फारुख शेख यांनी नगरविकास सचिवांकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती की, कोणत्या आधारावर रस्त्याचे नियोजन तीन वेळा बदलण्यात आले? परंतु, माहिती अधिकारी यांनी मंत्रालयात आग लागल्याचे कारण पुढे करून अर्ज फेटाळले होते. याच संदर्भात राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी जनमाहिती अधिकारी तथा अवर सचिव नगरविकास विभाग संजय सवाजी यांच्यावर कडक ताषेरे ओढले आहेत. अर्जदार शेख यांना ५ हजार रुपये नुकसान भरपाई जनमाहिती अधिकारी यांच्या पगारातून देण्यात यावी, असे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहायक सचिव देण्यात आले आहेत.याच संदर्भातील माहिती स्वराज अभियानाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर, स्वराज अभियान कार्यकर्ते अर्जदार फारुख शेख, डॉमनिक लोबो एका पत्रकार परिषेदेद्वारे दिली आहे. या संदर्भातील हकिकत अशी, शेख यांच्या वडिलांनी जुनी सांगवी येथील ममतानगरमध्ये तीन गुंठ्यांच्या प्लॉटमध्ये १२०० चौरस फुटांचे घर बांधले होते. १९८५ सालच्या नकाशानुसार त्यांच्या घराच्या पूर्व बाजूने साठ फुटी मार्ग नियोजित होता. परंतु, काही राजकीय व्यक्तींना लाभ पोहोचविण्यासाठी तीन वेळा रस्त्याचे स्थान बदलण्यात आले. १९९१ साली ह्या नकाशात हा मार्ग मध्यभागी घेण्यात आला. आणि १९९९ साली फारुख शेख व इतर नागरिकांच्या घरावरून रस्ता नेण्याचे ठरविले होते.(वार्ताहर)या संदर्भात राज्य मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अपीलकर्त्यांनी १५ डिसेंबर २०१५, १७ मार्च २०१६ रोजी अपील करूनही जन माहिती अधिकाऱ्यांकडून माहिती देणे बंधनकारक असतानाही माहिती दिली गेली नाही. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले असून, कमालीचा बेजबाबदारपणा दाखविला आहे. जी माहिती उपलब्ध नाही, त्याबाबत मुद्देनिहाय स्पष्ट व विविक्षित उत्तर अपीलकर्ता यांना ३ मे २०१६पर्यंत पाठवावे. या व्यतिरिक्त अर्जदार शेख झालेल्या मानसिक त्रासाबद्दल त्यांना पाच हजार रुपये देण्यात यावेत आणि ते जन माहिती आधिकारी यांच्या पगारातून द्यावेत.