शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

माहिती अधिकाऱ्याला दंड

By admin | Updated: April 29, 2016 02:05 IST

राजकीय दबावामुळे तीन वेळा रस्त्यांचे स्थान बदलून निर्दोषांची घरे पाडण्याचा २०११मध्ये घडला होता.

पिंपळे गुरव : राजकीय दबावामुळे तीन वेळा रस्त्यांचे स्थान बदलून निर्दोषांची घरे पाडण्याचा २०११मध्ये घडला होता. या संदर्भात पीडित फारुख शेख यांनी नगरविकास सचिवांकडे माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती की, कोणत्या आधारावर रस्त्याचे नियोजन तीन वेळा बदलण्यात आले? परंतु, माहिती अधिकारी यांनी मंत्रालयात आग लागल्याचे कारण पुढे करून अर्ज फेटाळले होते. याच संदर्भात राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी जनमाहिती अधिकारी तथा अवर सचिव नगरविकास विभाग संजय सवाजी यांच्यावर कडक ताषेरे ओढले आहेत. अर्जदार शेख यांना ५ हजार रुपये नुकसान भरपाई जनमाहिती अधिकारी यांच्या पगारातून देण्यात यावी, असे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहायक सचिव देण्यात आले आहेत.याच संदर्भातील माहिती स्वराज अभियानाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मारुती भापकर, स्वराज अभियान कार्यकर्ते अर्जदार फारुख शेख, डॉमनिक लोबो एका पत्रकार परिषेदेद्वारे दिली आहे. या संदर्भातील हकिकत अशी, शेख यांच्या वडिलांनी जुनी सांगवी येथील ममतानगरमध्ये तीन गुंठ्यांच्या प्लॉटमध्ये १२०० चौरस फुटांचे घर बांधले होते. १९८५ सालच्या नकाशानुसार त्यांच्या घराच्या पूर्व बाजूने साठ फुटी मार्ग नियोजित होता. परंतु, काही राजकीय व्यक्तींना लाभ पोहोचविण्यासाठी तीन वेळा रस्त्याचे स्थान बदलण्यात आले. १९९१ साली ह्या नकाशात हा मार्ग मध्यभागी घेण्यात आला. आणि १९९९ साली फारुख शेख व इतर नागरिकांच्या घरावरून रस्ता नेण्याचे ठरविले होते.(वार्ताहर)या संदर्भात राज्य मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, अपीलकर्त्यांनी १५ डिसेंबर २०१५, १७ मार्च २०१६ रोजी अपील करूनही जन माहिती अधिकाऱ्यांकडून माहिती देणे बंधनकारक असतानाही माहिती दिली गेली नाही. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले गेले असून, कमालीचा बेजबाबदारपणा दाखविला आहे. जी माहिती उपलब्ध नाही, त्याबाबत मुद्देनिहाय स्पष्ट व विविक्षित उत्तर अपीलकर्ता यांना ३ मे २०१६पर्यंत पाठवावे. या व्यतिरिक्त अर्जदार शेख झालेल्या मानसिक त्रासाबद्दल त्यांना पाच हजार रुपये देण्यात यावेत आणि ते जन माहिती आधिकारी यांच्या पगारातून द्यावेत.