शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

दोन घोट पाण्यासाठी मोर रस्त्यावर

By admin | Updated: June 10, 2017 01:58 IST

मुळशी तालुक्यात काही ठिकाणी दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असताना याची झळ आता वन्यप्राण्यांना बसू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : मुळशी तालुक्यात काही ठिकाणी दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक असताना याची झळ आता वन्यप्राण्यांना बसू लागली आहे. राष्ट्रीय पक्षी असलेले मोर आता पाण्यासाठी थेट नागरीवस्तीत येऊ लागले असून भरदिवसा त्यांचे दर्शन होत आहे. भूगावमधील माताळवाडी फाटा येथे याच प्रकारे भर सिमेंटच्या जंगलात, प्रमुख रस्त्यावर मोर आढळुन आला. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी वन विभागाला कळवले. वन विभागाने या मोराला दारवली येथील जंगलात सोडून दिले.जंगले उद्ध्वस्त करणे, खाणीसाठी डोंगराचे उत्खनन करणे, वाढत्या बांधकामांमुळे वनराईवर आक्रमण करणे आदी गोष्टींमुळे वनसंपत्ती नष्ट झाली. नैसर्गिक संपत्ती संपत चालली. जलस्रोत कमी झाले. पर्यावरण बिघडले. प्रदूषण वाढले आणि म्हणूनच वन्यप्राण्यांची घुसमट होत आहे. अशा परिस्थितीत तहान, भक्ष्य, निवारा यांच्या शोधार्थ त्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील महिन्यातच पौड येथे भर रस्त्यावर सांबर पिण्याच्या पाण्याच्या शोधात गावात आले होते. गावातील भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून मारून टाकले. वनविभागाकडून वनक्षेत्रात चारा-पाण्याची व्यवस्था केली जात नसल्याने वन्यप्राणी भरदिवसाही नागरी वस्तीत येऊ लागले आहेत, अशी टीका नागरिकांकडून केली जात आहे.वन्य प्राण्यांच्या चाऱ्यासाठी वनविभागातील गवताच्या काड्या पेटवून दिला जात असल्याने चारा, पाणी, वृक्षांच्या बेसुमार कत्तलीमुळे या वनविभागातील वन्य पशुपक्ष्यांवर व वन्य प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. यातूनच वन्यप्राणी नागरीवस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. तालुक्यातील वनविभागाने चारा-पाण्याची सुविधा उपलब्ध केल्यास वन्य प्राण्यांची व वन्यपशुपक्ष्यांचे होणारे स्थलांतर थांबेल.- सचिन मिरघेसरपंच, आदर्श ग्रामपंचायत भूगाव