शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पवना नदी होणार प्रदूषणमुक्त

By admin | Updated: March 28, 2017 02:38 IST

पवनानदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये धोबीघाट बांधून आंघोळ, कपडे धुण्यासाठी व गावातील

शिरगाव : पवनानदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये धोबीघाट बांधून आंघोळ, कपडे धुण्यासाठी व गावातील इतर सांडपाणी याचा वापर झाल्यावर हे पाणी धोबीघाटात शुद्ध करून नंतर नदीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात गोडुंब्रे येथे रविवारी भूमिपूजनाने करण्यात आली. सदर प्रकल्पामध्ये नदीकाठच्या ३२ गावांचा समावेश करून प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वेळी पावन पवनाचे प्रवीण लडकत, ग्रामप्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकट भताने, मनोज पुरावे, सुनील शिंदे, हेमंत वाटावे, रवी सावंत, विजय वायदंडे, डॉ. विश्वास येवले, राजीव भावसर, धनंजय गोडबोले, रमेश सरदेसाई, मोहन गायकवाड, प्रशांत हंबर, लक्ष्मिकान्त भवसागर, सरपंच रेखा सावंत, उपसरपंच नर्मदा येवले, माजी सरपंच राम सावंत, गणेश सावंत, माजी उपसरपंच आशालता चोरघे, संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्या सारिका कदम, खराडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे यांच्या प्रयत्नातून पवनामाई उत्सवांतर्गत २० वर्षांपासून चळवळ सुरू आहे. याच संकल्पनेतून पवनाकाठच्या गावांचा विकास व गावे सांडपाणीमुक्त व कचरामुक्त करण्याच्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्यात आला. (वार्ताहर)वृक्षलागवड : स्वच्छ, सुंदर गाव संकल्पनाया उपक्रमांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्रदूषणमुक्त नदीघाट, आदर्श शाळा विकास करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, वृक्षलागवड, स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेला तीन संगणक संच व एलसीडी प्रोजेक्टर भेट देण्यात आला. गावात बंधारा बांधून सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून नदीत सोडण्यात येणार आहे. घर व परिसर स्वच्छ, तर गाव स्वच्छ अन् गाव स्वच्छ तर नदी स्वच्छ या संकल्पनेतून आर्ट आॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना प्रबोधन करत असून, स्वच्छतेची शपथ देत आहेत. येथील भावसार व्हीजन, जलदिंडी प्रतिष्ठान, सिटीझन फोरम, नाम फाउंडेशन, कला जनसेट, आर्ट आॅफ लिव्हिंग, म्याथ्यूर प्लांट, जेएसपीएम संस्था, निसर्ग मित्र, संस्कार प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत आदींसह २३ संस्था, तसेच परिसरातील ग्रामप्रबोधिनी विद्यालय, प्रकाश देवळे विद्यालय, पंचक्रोशी हायस्कूल, तुळजाभवानी विद्यालय आदीसह जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांचा हातभार लागणार आहे