शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पवना नदी होणार प्रदूषणमुक्त

By admin | Updated: March 28, 2017 02:38 IST

पवनानदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये धोबीघाट बांधून आंघोळ, कपडे धुण्यासाठी व गावातील

शिरगाव : पवनानदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये धोबीघाट बांधून आंघोळ, कपडे धुण्यासाठी व गावातील इतर सांडपाणी याचा वापर झाल्यावर हे पाणी धोबीघाटात शुद्ध करून नंतर नदीत सोडण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात गोडुंब्रे येथे रविवारी भूमिपूजनाने करण्यात आली. सदर प्रकल्पामध्ये नदीकाठच्या ३२ गावांचा समावेश करून प्रत्येक गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वेळी पावन पवनाचे प्रवीण लडकत, ग्रामप्रबोधिनीचे प्राचार्य व्यंकट भताने, मनोज पुरावे, सुनील शिंदे, हेमंत वाटावे, रवी सावंत, विजय वायदंडे, डॉ. विश्वास येवले, राजीव भावसर, धनंजय गोडबोले, रमेश सरदेसाई, मोहन गायकवाड, प्रशांत हंबर, लक्ष्मिकान्त भवसागर, सरपंच रेखा सावंत, उपसरपंच नर्मदा येवले, माजी सरपंच राम सावंत, गणेश सावंत, माजी उपसरपंच आशालता चोरघे, संतोष कदम, ग्रामपंचायत सदस्या सारिका कदम, खराडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामप्रबोधिनी साळुंब्रे यांच्या प्रयत्नातून पवनामाई उत्सवांतर्गत २० वर्षांपासून चळवळ सुरू आहे. याच संकल्पनेतून पवनाकाठच्या गावांचा विकास व गावे सांडपाणीमुक्त व कचरामुक्त करण्याच्याला प्रोत्साहन देण्यासाठी संस्थांच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्यात आला. (वार्ताहर)वृक्षलागवड : स्वच्छ, सुंदर गाव संकल्पनाया उपक्रमांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्रदूषणमुक्त नदीघाट, आदर्श शाळा विकास करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, वृक्षलागवड, स्वच्छ व सुंदर गाव ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून शाळेला तीन संगणक संच व एलसीडी प्रोजेक्टर भेट देण्यात आला. गावात बंधारा बांधून सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करून नदीत सोडण्यात येणार आहे. घर व परिसर स्वच्छ, तर गाव स्वच्छ अन् गाव स्वच्छ तर नदी स्वच्छ या संकल्पनेतून आर्ट आॅफ लिव्हिंगचे कार्यकर्ते गावातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना प्रबोधन करत असून, स्वच्छतेची शपथ देत आहेत. येथील भावसार व्हीजन, जलदिंडी प्रतिष्ठान, सिटीझन फोरम, नाम फाउंडेशन, कला जनसेट, आर्ट आॅफ लिव्हिंग, म्याथ्यूर प्लांट, जेएसपीएम संस्था, निसर्ग मित्र, संस्कार प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत आदींसह २३ संस्था, तसेच परिसरातील ग्रामप्रबोधिनी विद्यालय, प्रकाश देवळे विद्यालय, पंचक्रोशी हायस्कूल, तुळजाभवानी विद्यालय आदीसह जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक यांचा हातभार लागणार आहे