शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

पवनामाईला घेतले दत्तक

By admin | Updated: May 8, 2017 02:39 IST

शहर परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नदीकाठी गावे, शहरे वसली, वाढली. नदीला आई म्हणूनही संबोधिले

 विश्वास मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहर परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नदीकाठी गावे, शहरे वसली, वाढली. नदीला आई म्हणूनही संबोधिले जाते. मात्र, निगरगट्ट शासकीय व्यवस्था आणि संवेदनाशून्य राज्यकर्ते यांच्यामुळे आईकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय पातळीवर नदी स्वच्छतेबाबत अनास्था असताना ‘आपले चिंचवड व्यासपीठा’च्या वतीने चिंचवड परिसरातून जाणारी पवना नदी दत्तक घेतली आहे. नमामि पवनामाई उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. नदी संवर्धनाच्या उपक्रमात अखिल चिंचवडकर उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी. यंत्र, तंत्रज्ञाननगरी. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून जातात, तर पवना नदी शहराच्या मध्यभागातून जाते. आघाडी आणि युती सरकारने नदीसुधार कार्यक्रम गुंडाळला आहे. त्यामुळे नद्याच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. जीवनदायिनी ठरणाऱ्या या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. नदी प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने नदीत राडारोडा आणि भराव टाकून पात्रही अरुंद होऊ लागले आहे. याकडे महापालिका प्रशासन किंवा राज्य शासन यांचे लक्ष नाही. लालफितीच्या कारभाराच्या अनास्थेमुळे चिंचवडमधील नागरिकांनी पुढाकार घेऊन आपले चिंचवड हे व्यासपीठ स्थापन केले आहे. पावसाळ्यानंतर पवनामाई अर्थात नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचते. त्यामुळे डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने गंगा नदीचे पावित्र्य आणि महत्त्व आपले चिंचवड हे व्यासपीठाच्या वतीने ‘नमामी पवनामाई, संकल्प पवनामाई संवर्धनाचा, उचलूया खारीचा वाटा...’ या उद्देशाने चिंचवड गावठाण ते केजुदेवी बंधाऱ्यापर्यंतची नदी दत्तक घेतली आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामी पवनामाई अभियानाच्या प्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ‘‘चिंचवडगावात पवना नदीतीरावर महासाधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. धनेश्वर पूल ते केजूदेवी बंधाऱ्यापर्यंतचे पात्र दत्तक घेतले आहे. याच भावनेतून आपले चिंचवड व्यासपीठ निर्माण केले आहे. लोकसहभागातून हा उपक्रम सुरू आहे. नदीपात्रातील अडथळे, पुलाचे काम झाल्यानंतर राहिलेला राडारोडा, गाळ, जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. पोकलेन, जेसीबी, डंपरच्या माध्यमातून गाळ काढला जात आहे. तसेच पाण्यावर तरंगणारी जलपर्णीही काढण्यात येत आहे. नदीपात्र स्वच्छ, सुंदर व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलूया वाटा खारीचा या संकल्पनेतून लोकसहभागातून काम सुरू आहे. त्यात चिंचवडकरांनी सहभागी व्हावे.’’एकजुटीने भारल्यावानी, तुफान आलंया...महाराष्ट्रातील अनेक भागातील पाण्याचे दुर्भीक्ष पाहता पाणी फाउंडेशनने खड्डे खोदाई पाणी साठवणूक होण्यासाठी श्रमदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे नदीचे सौंदर्य कायम राहावे, यासाठी नदीस्वच्छतेचा उपक्रम आपले चिंचवड व्यासपीठाने हाती घेतला आहे.‘एकजुटीने भारल्यावानी नदी स्वच्छतेचे तुफान आलंया...’ याचा अनुभव चिंचवडला येत आहे. नागरिक एकजुटीने नदी स्वच्छता मोहिमेत दर रविवारी उतरत आहेत.