शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

पवनामाईला घेतले दत्तक

By admin | Updated: May 8, 2017 02:39 IST

शहर परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नदीकाठी गावे, शहरे वसली, वाढली. नदीला आई म्हणूनही संबोधिले

 विश्वास मोरे/  लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : शहर परिसरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्या वाहतात. नदीकाठी गावे, शहरे वसली, वाढली. नदीला आई म्हणूनही संबोधिले जाते. मात्र, निगरगट्ट शासकीय व्यवस्था आणि संवेदनाशून्य राज्यकर्ते यांच्यामुळे आईकडे दुर्लक्ष होत आहे. शासकीय पातळीवर नदी स्वच्छतेबाबत अनास्था असताना ‘आपले चिंचवड व्यासपीठा’च्या वतीने चिंचवड परिसरातून जाणारी पवना नदी दत्तक घेतली आहे. नमामि पवनामाई उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविले जात आहे. नदी संवर्धनाच्या उपक्रमात अखिल चिंचवडकर उतरले आहेत. पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी. यंत्र, तंत्रज्ञाननगरी. इंद्रायणी आणि मुळा या नद्या शहराच्या सीमेवरून जातात, तर पवना नदी शहराच्या मध्यभागातून जाते. आघाडी आणि युती सरकारने नदीसुधार कार्यक्रम गुंडाळला आहे. त्यामुळे नद्याच्या प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. जीवनदायिनी ठरणाऱ्या या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. नदी प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील जमिनींना सोन्याचा भाव आल्याने नदीत राडारोडा आणि भराव टाकून पात्रही अरुंद होऊ लागले आहे. याकडे महापालिका प्रशासन किंवा राज्य शासन यांचे लक्ष नाही. लालफितीच्या कारभाराच्या अनास्थेमुळे चिंचवडमधील नागरिकांनी पुढाकार घेऊन आपले चिंचवड हे व्यासपीठ स्थापन केले आहे. पावसाळ्यानंतर पवनामाई अर्थात नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचते. त्यामुळे डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने गंगा नदीचे पावित्र्य आणि महत्त्व आपले चिंचवड हे व्यासपीठाच्या वतीने ‘नमामी पवनामाई, संकल्प पवनामाई संवर्धनाचा, उचलूया खारीचा वाटा...’ या उद्देशाने चिंचवड गावठाण ते केजुदेवी बंधाऱ्यापर्यंतची नदी दत्तक घेतली आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नमामी पवनामाई अभियानाच्या प्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ‘‘चिंचवडगावात पवना नदीतीरावर महासाधू मोरया गोसावी यांची समाधी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. धनेश्वर पूल ते केजूदेवी बंधाऱ्यापर्यंतचे पात्र दत्तक घेतले आहे. याच भावनेतून आपले चिंचवड व्यासपीठ निर्माण केले आहे. लोकसहभागातून हा उपक्रम सुरू आहे. नदीपात्रातील अडथळे, पुलाचे काम झाल्यानंतर राहिलेला राडारोडा, गाळ, जलपर्णी काढण्याचे काम सुरू केले आहे. पोकलेन, जेसीबी, डंपरच्या माध्यमातून गाळ काढला जात आहे. तसेच पाण्यावर तरंगणारी जलपर्णीही काढण्यात येत आहे. नदीपात्र स्वच्छ, सुंदर व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलूया वाटा खारीचा या संकल्पनेतून लोकसहभागातून काम सुरू आहे. त्यात चिंचवडकरांनी सहभागी व्हावे.’’एकजुटीने भारल्यावानी, तुफान आलंया...महाराष्ट्रातील अनेक भागातील पाण्याचे दुर्भीक्ष पाहता पाणी फाउंडेशनने खड्डे खोदाई पाणी साठवणूक होण्यासाठी श्रमदानाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे नदीचे सौंदर्य कायम राहावे, यासाठी नदीस्वच्छतेचा उपक्रम आपले चिंचवड व्यासपीठाने हाती घेतला आहे.‘एकजुटीने भारल्यावानी नदी स्वच्छतेचे तुफान आलंया...’ याचा अनुभव चिंचवडला येत आहे. नागरिक एकजुटीने नदी स्वच्छता मोहिमेत दर रविवारी उतरत आहेत.