शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पवना धरण आटले आता, पड पड रे पावसा...

By admin | Updated: June 19, 2016 04:41 IST

पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस

पवनानगर : पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने चिंता आणखी वाढली आहे.मागील वर्षी २०१५मध्ये पाऊस कमी झाल्याने पवना धरण अवघे ८० टक्के इतके भरले होते. या वर्षी अर्धा जून संपला, तरीदेखील पाऊस सुरू न झाल्याने धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. धरण हे नदीसारखे दिसू लागले आहे. आजअखेर धरण पाणलोट क्षेत्रात फक्त २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. उपयुक्त साठा ३३ घनमीटर आहे. यामुळे पाण्याची समस्या आता तीव्र होण्याची भीती आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेसने ६ तास पाणी विसर्ग होत आहे. यात आता सोमवारपासून बदल करण्यात येणार असून, ४०० क्युसेसने पाणी विसर्ग केला जाणार आहे. यामुळे आता पाणीकपातीसोबत पाणी जपून वापरावे लागणार आहे. आकाशात ढग दिसत असले, तरी पाऊस मात्र नसल्याने पावसाची अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, हा चिंतेचा विषय आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला असता १८ जून अखेर पडलेला पाऊस याचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या वर्षी आहे. तर सर्वांत कमी पाऊस २००१ साली झाला होता. तो फक्त १६३१ मिलिमीटर इतका होता. तर सर्वांत जास्त पाऊस २००५ साली झाला होता. तो ६५६८ इतका झाला होता.२०११ साली २ जून रोजी सर्वांत लवकर पाऊस सुरू झाला होता. त्या वर्षी जून महिन्यात ७७३ इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्या वेळी पावसाची प्रतीक्षा करावी लागली नाही.गाळ काढण्याचे नियोजन न झाल्याने वाळूमाफीयाप्रमाणे माजी माफीया तयार होऊन वाद वाढत गेल्याने गाळ उपसा शासनाने थांबवला आहे. पुढील वर्षी महापालिकेने खर्च करून हा गाळ फक्त शेतकऱ्यांच्या शेतासाठीच द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या वर्षी मातीमधून वीटभट्टी व्यवसायाचा मोठा फायदा झाला. व काहींनी यातून लाखोंची कमाई केली. पाण्याची इतकी गरज असताना पवना धरणाचे मजबुतीकरण मात्र गेल्या १६ वर्षांपासून रखडले आहे. यावर २४ कोटींपैकी १० कोटी खर्च झाला आहे. मात्र, १० कोटींचा निधी मजबुतीकरण धरणग्रस्तांनी थांबविल्याने पडून आहे.धरणात १० टीएमसी पाणी साठवण क्षमता असतानादेखील धरणाच्या किरकोळ डागडुजीवर या वर्षी १ रुपयादेखील खर्च झालेला नाही. धरणाचे काम पूर्ण होऊन ४० वर्षे झाली आहेत. यामुळे धरणाची किरकोळ डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पूर्ण दुर्लक्ष असून, धरणाच्या किरकोळ कामासाठी किमान ३० लाखांपर्यंतचा खर्च करून योग्य ती डागडुजी होणे गरजेचे आहे, असे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी सांगितले.