शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

पवना धरण आटले आता, पड पड रे पावसा...

By admin | Updated: June 19, 2016 04:41 IST

पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस

पवनानगर : पवना धरणाने तळ गाठला असून, १३% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ४० वर्षांच्या इतिहासात जून महिन्यात पहिल्यांदाच इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्याने चिंता आणखी वाढली आहे.मागील वर्षी २०१५मध्ये पाऊस कमी झाल्याने पवना धरण अवघे ८० टक्के इतके भरले होते. या वर्षी अर्धा जून संपला, तरीदेखील पाऊस सुरू न झाल्याने धरणाची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. धरण हे नदीसारखे दिसू लागले आहे. आजअखेर धरण पाणलोट क्षेत्रात फक्त २३ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. उपयुक्त साठा ३३ घनमीटर आहे. यामुळे पाण्याची समस्या आता तीव्र होण्याची भीती आहे. धरणातून दररोज १२०० क्युसेसने ६ तास पाणी विसर्ग होत आहे. यात आता सोमवारपासून बदल करण्यात येणार असून, ४०० क्युसेसने पाणी विसर्ग केला जाणार आहे. यामुळे आता पाणीकपातीसोबत पाणी जपून वापरावे लागणार आहे. आकाशात ढग दिसत असले, तरी पाऊस मात्र नसल्याने पावसाची अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, हा चिंतेचा विषय आहे. मागील पाच वर्षांचा विचार केला असता १८ जून अखेर पडलेला पाऊस याचा विचार करता सर्वात कमी पाणीसाठा या वर्षी आहे. तर सर्वांत कमी पाऊस २००१ साली झाला होता. तो फक्त १६३१ मिलिमीटर इतका होता. तर सर्वांत जास्त पाऊस २००५ साली झाला होता. तो ६५६८ इतका झाला होता.२०११ साली २ जून रोजी सर्वांत लवकर पाऊस सुरू झाला होता. त्या वर्षी जून महिन्यात ७७३ इतक्या पावसाची नोंद झाली होती. त्या वेळी पावसाची प्रतीक्षा करावी लागली नाही.गाळ काढण्याचे नियोजन न झाल्याने वाळूमाफीयाप्रमाणे माजी माफीया तयार होऊन वाद वाढत गेल्याने गाळ उपसा शासनाने थांबवला आहे. पुढील वर्षी महापालिकेने खर्च करून हा गाळ फक्त शेतकऱ्यांच्या शेतासाठीच द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या वर्षी मातीमधून वीटभट्टी व्यवसायाचा मोठा फायदा झाला. व काहींनी यातून लाखोंची कमाई केली. पाण्याची इतकी गरज असताना पवना धरणाचे मजबुतीकरण मात्र गेल्या १६ वर्षांपासून रखडले आहे. यावर २४ कोटींपैकी १० कोटी खर्च झाला आहे. मात्र, १० कोटींचा निधी मजबुतीकरण धरणग्रस्तांनी थांबविल्याने पडून आहे.धरणात १० टीएमसी पाणी साठवण क्षमता असतानादेखील धरणाच्या किरकोळ डागडुजीवर या वर्षी १ रुपयादेखील खर्च झालेला नाही. धरणाचे काम पूर्ण होऊन ४० वर्षे झाली आहेत. यामुळे धरणाची किरकोळ डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र, याकडे पूर्ण दुर्लक्ष असून, धरणाच्या किरकोळ कामासाठी किमान ३० लाखांपर्यंतचा खर्च करून योग्य ती डागडुजी होणे गरजेचे आहे, असे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी सांगितले.