शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस विमा नसल्याने रुग्णांची फरफट

By admin | Updated: January 10, 2015 00:39 IST

विमा कंपन्या आणि रुग्णालये यांच्यामधील वादामुळे कॅशलेस विमा योजना बंद करण्यात आल्याने त्याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे.

पुणे : विमा कंपन्या आणि रुग्णालये यांच्यामधील वादामुळे कॅशलेस विमा योजना बंद करण्यात आल्याने त्याचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. कॅशलेस आरोग्य विमा काढूनही रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर पैसे भरावे लागत असल्याने रुग्ण तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलू लागले आहेत.उपचार, शस्त्रक्रियांच्या दरांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विमा कंपन्यांनी एकत्र येत नवे दर गेल्यावर्षी जाहीर केले होते. हे दर छोट्या, मध्यम व मोठ्या रुग्णालयांसाठी वेगवेगळे आहेत. छोट्या व मध्यम रुग्णालयांसाठी देण्यात आलेले दर खूपच कमी असल्याने ते वाढवून देण्याची मागणी रुग्णालयांनी वेळोवेळी केली होती; मात्र त्याची दखल विमा कंपन्यांनी घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रुग्णालयांनी १ डिसेंबरपासून कॅशलेस सेवा पूर्णपणे बंद केली. याचा फटका विमाधारक रुग्णांना बसत आहे. या सगळ्या वादात रुग्ण भरडले जात असल्याने त्यावर तातडीने तोडगा निघावा, अशी मागणी विमाधारक रुग्णांकडून केली जात आहे.विम्याचे पैसे भरूनही उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णांना पैसे भरण्याची सक्ती रुग्णालयांकडून केली जात आहे. यात अनेक शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी पैशांची ताबडतोब जुळणी होत नसल्याने तातडीच्या वगळता इतर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया थोड्या उशिरा केल्या तर चालतील का, अशी विचारणा रुग्ण डॉक्टरांकडे करीत आहेत. त्यांचा होकार मिळताच शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत, अशी माहिती काही रुग्णालयांनी दिली.