शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

बीआरटी मार्गावर प्रवासी असुरक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:51 IST

गतिमान बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले सर्वच ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) मार्ग प्रवाशांसाठी अजूनही असुरक्षितच आहेत.

पुणे : गतिमान बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले सर्वच ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) मार्ग प्रवाशांसाठी अजूनही असुरक्षितच आहेत. हे मार्ग रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या सातारा रस्त्यावरील बीआरटीचीही तिच स्थिती आहे.शहरात पहिल्यांदा ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गावर बीआरटी सुरू करण्यात आली. हा पथदर्शी प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे लोटली. या बीआरटीमध्ये सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी आढळून आल्या. त्या त्रुटी आजअखेरपर्यंत कायम आहेत. हा मार्ग रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत होती. वर्षानुवर्षे प्रवाशांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या या मार्गाचे नूतणीकरण केले जात आहे; मात्र त्यातही प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्रुटी असल्याचे समोर आले आहे. ‘स्वारगेट ते कात्रज’ मार्गानंतर शहरात हडपसर रस्त्यावर २ ते ३ किमी अंतराचा अर्धवट बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. त्यापाठोपाठ ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी,’ ‘येरवडा ते वाघोली’ तसेच पिंपरी-चिंचवड शहरातही काही मार्ग सुरू करण्यात आले. हे सर्वच मार्ग प्रवाशांसाठी कसरतीचे ठरत आहे. पथदर्शी मार्गातील त्रुटी इतर मार्गांमध्येही कायम दिसून येत आहेत.नव्याने तयार होत असलेल्या कात्रज बीआरटी मार्गावर सध्या बस प्रवाशांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी सुविधा नसल्याचे दिसून येत आहेत. ‘येरवडा ते वाघोली’ आणि ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ मार्गावर काही बसथांब्यांच्या लगत प्रवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी पांढरे पट्टे तसेच गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर वाहने सुसाट जातात. एक-दोन ठिकाणी पूल व भुयारी मार्ग आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेले रबराचे गतिरोधक काढण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे ठरते. विशेषत: महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. सायंकाळी बहुतेक मार्गांवर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे या वेळेत रस्ता ओलांडणे अधिक धोकादायक ठरते.>समितीने केली पाहणीसातारा रस्ता, सोलापूर रस्ता, नगर रस्ता आणि संगमवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गासाठी स्वतंत्र देखरेख समिती स्थापन केली आहे. तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली आहे. या समितीने बीआरटी मार्गाची पाहणीही केली, त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत पालिकेच्या संबंधित विभागाला सुधारणा करण्याबाबत कळविण्यात आले आहे.समितीकडून येरवडा ते वाघोली मार्गाची पाहणी केल्यानंतर, त्याबाबतच्या त्रुटींबाबत पालिकेला कळविले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना मुख्य रस्ता सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी ठिकठिकाणी रिफलेक्टर्स बसविणे, फलक लावणे, विविध चिन्हे लावणे आवश्यक आहे. याबाबत सूचित करण्यात आले आहे.- अजय चारठणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी