शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाटघर धरणावरील बागेची दुरवस्था

By admin | Updated: May 29, 2017 02:00 IST

ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी ठिकाण नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाच्या वतीने भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला बागीचा तयार करून त्यात विविध प्रकारची झाडे, वेली, फुलझाडे, कारंजे तयार करुन पर्यटकांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आली होती. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना व शाळा-कॉलेजच्या सहलीला येणाऱ्या विद्यार्थांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. बागेतून भाटघर धरणाच्या पाण्याचे सुंदर विहंगम चित्र दिसते. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.मात्र १० वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या बागेकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील झाडे, वेली, फुले वाळून गेली आहेत. कारंजे बंद पडले आहे. बाग म्हणून त्याचे काहीच अस्तित्व राहिलेच नाही. मोकाट जनावरे या बागेत फिरत असतात.पाटबंधारे विभागाने भाटघर धरणाच्या काठावरील बाग पुनर्जीवित करावी. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचा फायदा पर्यायाने पाटबंधारे विभागालाच होणार आहे. मात्र ते उदासीन असल्याचे दिसते.