शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत ‘जाळ्यां’ची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:52 IST

सर्वसामान्यांना त्रास : वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष, वाहनचालकांवर मात्र कारवाई

पुणे : ‘ओ ओ.. इथे गाडी लाऊ नका, दिसत नाही का जाळी टाकलीय?, तुमची गाडी पुढे लावा’ अशा एक ना अनेक अनुभवांना सर्वसामान्य नागरिकांना मध्यवस्तीतील बाजारपेठेत सामोरे जावे लागते. ग्राहकांना दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळावा, याकरिता दुकानदारांकडून रस्त्यावर जाळ्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांची अडचण होत असून सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.

मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई परिसर, रविवार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असतात. या नागरिकांना नेहमीच वाहतूककोंडीसह पार्किंगचा प्रश्न सतावत असतो. मध्यवर्ती पेठांमध्येच शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने मुळातच अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त लावल्याने वाहतूककोंडी होते. त्यातच दुकानदार दुकानांसमोर लोखंडी जाळ्या टाकून ठेवतात.

वास्तविक, दुकानांच्या समोर पदपथ आहे. पदपथ आणि रस्त्याच्या मध्ये दुभाजक बसविलेले आहेत. या दुभाजकांमध्ये जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे व्यावसायिक या लोखंडी जाळ्या टाकतात. त्यामुळे नागरिक आणि दुकानदारांमध्येही अनेकदा वाद होतात.अडचणी अन् जाळ्याजवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर अनधिकृत पथारी धारकांनी जागा व्यापलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणेही मुश्कील होते. त्यातच जाळ्या रस्त्यावर आल्याने अडचणींमध्ये आणखीनच भर पडत असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावर जाळी टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जाते. रस्त्यावर जाळ्या टाकल्याचे आढळून आल्यास त्या जाळ्या जप्त केल्या जातात. मात्र, महापालिकेचे त्याविषयीचे धोरण अद्याप ठरलेले नाही. त्यासाठी धोरण ठरवावे लागेल. नागरिकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर नक्कीच अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाईल.- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग

दुकानदारांकडून स्वत:च्या फायद्याकरिता रस्त्यावर जाळ्या टाकल्या जातात; मात्र या जाळ्यांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. अनेकदा तर त्यामध्ये पाय अडकून पडायला होते. नागरिकांना या जाळ्यांमुळे वाहने तेथे उभी करता येत नाहीत. अनेकदा दुकानदारांशी वाद होतो. मात्र, कोणीही नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. याबाबत ठोस कारवाई होण्याची आवश्यकता आहे.- प्रकाश आठवले, ज्येष्ठ नागरिक, शनिवार पेठ

टॅग्स :Parkingपार्किंग