शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत ‘जाळ्यां’ची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:52 IST

सर्वसामान्यांना त्रास : वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष, वाहनचालकांवर मात्र कारवाई

पुणे : ‘ओ ओ.. इथे गाडी लाऊ नका, दिसत नाही का जाळी टाकलीय?, तुमची गाडी पुढे लावा’ अशा एक ना अनेक अनुभवांना सर्वसामान्य नागरिकांना मध्यवस्तीतील बाजारपेठेत सामोरे जावे लागते. ग्राहकांना दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळावा, याकरिता दुकानदारांकडून रस्त्यावर जाळ्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांची अडचण होत असून सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.

मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई परिसर, रविवार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असतात. या नागरिकांना नेहमीच वाहतूककोंडीसह पार्किंगचा प्रश्न सतावत असतो. मध्यवर्ती पेठांमध्येच शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने मुळातच अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त लावल्याने वाहतूककोंडी होते. त्यातच दुकानदार दुकानांसमोर लोखंडी जाळ्या टाकून ठेवतात.

वास्तविक, दुकानांच्या समोर पदपथ आहे. पदपथ आणि रस्त्याच्या मध्ये दुभाजक बसविलेले आहेत. या दुभाजकांमध्ये जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे व्यावसायिक या लोखंडी जाळ्या टाकतात. त्यामुळे नागरिक आणि दुकानदारांमध्येही अनेकदा वाद होतात.अडचणी अन् जाळ्याजवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर अनधिकृत पथारी धारकांनी जागा व्यापलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणेही मुश्कील होते. त्यातच जाळ्या रस्त्यावर आल्याने अडचणींमध्ये आणखीनच भर पडत असल्याचे चित्र आहे. 

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावर जाळी टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जाते. रस्त्यावर जाळ्या टाकल्याचे आढळून आल्यास त्या जाळ्या जप्त केल्या जातात. मात्र, महापालिकेचे त्याविषयीचे धोरण अद्याप ठरलेले नाही. त्यासाठी धोरण ठरवावे लागेल. नागरिकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर नक्कीच अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाईल.- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग

दुकानदारांकडून स्वत:च्या फायद्याकरिता रस्त्यावर जाळ्या टाकल्या जातात; मात्र या जाळ्यांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. अनेकदा तर त्यामध्ये पाय अडकून पडायला होते. नागरिकांना या जाळ्यांमुळे वाहने तेथे उभी करता येत नाहीत. अनेकदा दुकानदारांशी वाद होतो. मात्र, कोणीही नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. याबाबत ठोस कारवाई होण्याची आवश्यकता आहे.- प्रकाश आठवले, ज्येष्ठ नागरिक, शनिवार पेठ

टॅग्स :Parkingपार्किंग