शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

‘ऑनलाइन गेम्स’च्या वेडामुळे पालकांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:12 IST

पुणे: ‘अरे, स्वप्निल किती वेळ खेळशील मोबाईल? बाहेर ये... आमच्याशी बोल तरी!’ मात्र मुलाचं काहीच उत्तर नाही. ...

पुणे: ‘अरे, स्वप्निल किती वेळ खेळशील मोबाईल? बाहेर ये... आमच्याशी बोल तरी!’ मात्र मुलाचं काहीच उत्तर नाही. घरोघरी हीच कहाणी! कोरोना काळात शाळा बंद. ऑनलाइन शिक्षणामुळे पालक आणि शाळांकडून मुलांच्या हातात सोपवलेले मोबाइल, टॅब, लॅपटॉप यामुळे मुलांना ‘स्क्रीन टाइम’च्या आणखी जवळ नेले आहे. मुलांचे स्वत:चे आभासी विश्व तयार झाले आहे. मुलांमधील गेम्सचे वाढते व्यसन आणि त्यातून निर्माण होणारी हिंसक प्रवृत्ती पालकांसाठी चिंतेची ठरू लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा खून केल्याची घटना पुण्यात घडली. इतक्या लहान वयात मुलांमध्ये इतकी हिंसा आली कुठून असा प्रश्न यातून निर्माण झाला. मोबाइल-कॉम्प्युटर गेम्सचे व्यसन हे त्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. कोरोना काळात तर शिक्षणपद्धतीतच आमूलाग्र बदल झाला असून जिथे पूर्वी मुलांना अर्ध्या तासाचा ‘स्क्रीन टाइम’ दिला जात होता तिथे मुलांचे अवघे विश्वच आता स्मार्ट फोन, टीव्ही, लॅपटॉपने व्यापून टाकल्याचे दिसत आहे. मनमोकळा संवाद, सर्जनशीलता, कल्पकता या गोष्टी हरवल्या असून आभासी जगामुळे मुले एकलकोंडी बनत आहेत. एखादी मनासारखी गोष्ट न घडल्यास चिडचिड करणे, हट्टीपणा, नकारात्मकता असे मानसिक बदल मुलांमध्ये दिसून येत आहेत. ही धोक्याची घंटा असल्याचा इशारा मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.

------------------------------------------- -----------------------------

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाइल किंवा लॅपटॉप देणे क्रमप्राप्त आहे. पण ऑनलाइन क्लास सुरू असताना मुले गेम्स खेळत असल्याचे दिसल्यानंतर आम्ही त्यांच्या मोबाइलमधून गेम्स उडवून टाकले. मात्र मुलांनी पुन्हा गेम्स डाऊनलोड केले : अमृता देशपांडे, पालक

---------------

इंडियन सायक्रॅटिक सोसायटीच्या नियमावलीनुसार दोन वर्षांच्या आतील मुलांना स्क्रीन टाइमची परवानगीच नाही. दोन ते पाच वयोगटात मुलांना पालकांच्या सल्ल्यानुसार मोबाइलसारख्या वस्तू हाताळण्यास द्याव्यात. शैक्षणिक साहित्य म्हणून त्याचा उपयोग केला तरी त्याचा कालावधी जास्त नसावा. ५ ते १८ वयोगटासाठी मुलांच्या स्क्रीन टाइमचे नियोजन करायला हवे. कॉमन रूममध्ये बसूनच मुलांना मोबाइल किंवा तत्सम गोष्टी हाताळण्यास द्यावे. यूट्यूबसह इतर अॅपना पासवर्ड लावावा.

-डॉ. सीमा दरोडे, क्लिनिकल अँड स्कूल सायकॉलॉजिस्ट

------------------------------------------------------------------------------

ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हातात सहजरीत्या मोबाइल आले. हिंसक गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढल्याने मुले आक्रमक होत चालली आहेत. मुलांना आता चार भिंतीतून बाहेर काढून उद्यानात, ट्रेकिंगला अथवा सहलींना घेऊन जावे.

-डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, ज्ञानदेवी संस्था