शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

पालक-विद्यार्थी बारावीच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:06 IST

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, मे महिना उजाडला तरी अद्याप ...

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, मे महिना उजाडला तरी अद्याप परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक परीक्षेच्या वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, लॉकडाऊन वाढवल्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक लवकर प्रसिद्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या आहेत. यंदा तब्बल १३ लाख १७ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. बारावीच्या परीक्षेबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश पूर्व परीक्षासुद्धा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे या सर्व परीक्षांचा अभ्यास आणखी किती दिवस करायचा, असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे.

प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले, कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थितीत केव्हा सुधारणा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे देश पातळीवरच ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षणबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तसेच विविध प्रवेश पूर्व परीक्षा आणि बारावीच्या परीक्षा या दोन्ही परीक्षांचा ताण विद्यार्थ्यांनी किती दिवस घ्यायचा याबाबतही काही मर्यादा निश्चित झाल्या पाहिजेत.

उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ४५ ते ६० दिवस लागणार

दहावीच्या परीक्षा सुरु झाल्यानंतर त्वरित उत्तरपत्रिका तपासणीच्या कामाला सुरुवात केली जाते. कोरोनामुळे मागील वर्षी शिक्षकांना त्यांच्या घरी उत्तरपत्रिका तपासण्याची मुभा दिली होती. यावर्षी सुद्धा परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका घरीच तपासाव्या लागतील, असे एकूण परिस्थितीवरून दिसून येत आहे. मात्र, मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता उत्तरपत्रिका तपासण्यासाठी सुमारे ४५ ते ६० दिवसांपेक्षाअधिक कालावधी लागू शकतो. परिणामी निकालही लांबू शकतो. त्यामुळे शासनाने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून परीक्षांबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा पालक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

कोट

बारावीच्या परीक्षेच्या निकालावर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात. त्याचप्रमाणे बारावीत मिळालेल्या गुणांचा विचार करून काही विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, याबाबत निर्णय घेतात. कोरोनाने निर्माण झालेल्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्यानंतर बारावीच्या परीक्षा घ्याव्यात. तसेच परीक्षेच्या वेळापत्रका‌संदर्भात शासनाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

- दिलीपसिंग विश्वकर्मा, अध्यक्ष, महापेरेंट्स