शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रेमप्रकरणात पालकांनी समजूतदारपणा दाखवावा : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 14:49 IST

प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआनंद कांबळे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे

पाषाण : प्रेमप्रकरणाविषयी भूमिका घेण्याअगोदर पालकांनी मुलांची बाजू समजून घेणे आवश्यक आहे. कुटुंबाने घेतलेल्या अगदी टोकाच्या निर्णयातून पाल्यांनी आयुष्य संपवले जाण्याच्या घटना समाजात वाढत आहे. ही समाजासाठी भूषणावह गोष्ट नाही. समाजातील जातीपातींचे निर्मूलन हे आंतरजातीय विवाहातूनच होवू शकते. तसेच आनंद कांबळे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दिवंगत आनंद कांबळे यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय विद्यार्थी सन्मान व शालेय साहित्य वाटपप्रसंगी ते औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, परशुराम वाडेकर, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनिता वाडेकर, डॉ. वासुदेव गाडे, भूपेश धुलकर, नगरसेवक बंडू ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका सोनाली लांडगे,मंदार जोशी आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले,सर्वसमाजाविषयी सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, समाजासाठी स्वत:ला विसरून काम करण्याची आठवण जपली पाहिजे. समाजाच्या शंकास्पद वातावरणात आपण आपल्या लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यावेळी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.  

टॅग्स :AundhऔंधRamdas Athawaleरामदास आठवले