शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक शाळा सुरू करण्यास आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)केलेल्या सर्वेक्षणात ५ ...

पुणे : कोरोनामुळे राज्यातील बंद असलेल्या शाळा सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी)केलेल्या सर्वेक्षणात ५ लाख ६० हजार ८१८ (८१.१८ टक्के) पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला आहे. त्यात राज्यातील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक २ लाख ८६ हजार ९९० पालक शाळा सुरू करण्यास आग्रही असल्याचे दिसून येत आहे.अनेक पालक शाळा सुरू करण्यास अनुकुल असल्याने राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एससीईआरटीच्या सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ७३ हजार ८३८ पालकांनी सहभाग घेतला आहे. तर मुंबई (बीएमसी) मधील ७० हजार ८४२ आणि मुंबई (डीवायडी)मधील ३९ हजार ३५१ पालकांनी सर्व्हेक्षणात सहभाग नोंदवला.सर्वेक्षणात राज्यातील एकूण ८१.१८ टक्के पालकांनी शाळा सुरू करण्यास होकार दर्शविला असला तरी १ लाख ३० हजार २ (१८.८२ टक्के) पालकांचा शाळा सुरू करण्यास अजूनही विरोध आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील कोरोना मुक्त ग्रामीण भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग येत्या १५ जुलैपासून सुरू करण्याबाबत एससीईआरटीतर्फे आॅनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. सोमवारी रात्री ११.५५ वाजेपर्यंत या सर्वेक्षणात सहभाग घेण्यास मुदत देण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणांत मत नोंदवले. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागातील प्रत्येकी ३ लाखाहून अधिक पालकांनी सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यामुळे अनेक पालक विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवण्यास अनुकुल असल्याचे दिसून येत आहे.परंतु,शासन शाळा सुरू करणार की नाही, हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.

-------------------

विद्यार्थी सुमारे दीड वर्षांपासून आॅनलाईन शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांना डोळ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे आता शासकीय नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या पाहिजे. शासनाने प्रत्येक शाळेसाठी लसीकरणासाठी वेगळी तरतुद केली पाहिजे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करायाल हवेत. स्थानिक प्रशासनाने सुध्दा शाळा सुरू करण्याबाबत साकारात्मक भूमिका घ्यायला हवी.

- दिलीप सिंग विश्वकर्मा,अध्यक्ष, महापॅरेंटस

------------------------

कोणत्या वगार्तील विद्यार्थ्यांच्या किती पालकांनी नोंदवले मत

नर्सरी : १९,२७३

पहिली ते पाचवी : १,६२,१८४

सहावी ते आठवी : २,१५,५९०

नववी ते दहावी : २,८६,९९०

अकरावी ते बारावी : १,०५,३९२

--------------

सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या राज्यातील पालकांची आकडेवारी

अहमदनगर - ३४,०६७, अकोला - ८,६७८, अमरावती -१६,०५१, औरंगाबाद - १२,९८८, बीड -११,०९६ , भंडारा -६,१९७, बुलढाणा -१४,०७१, चंद्रपूर -१२,८२२, धुळे - ८,०३२, गडचिरोली - ३,१३१ , गोंदिया ६,७३५, हिंगोली -४७१०, जळगाव -१८,७८०, जालना- ८,५८१, कोल्हापूर-३०,४३७ , लातूर १०३०२, मुंबई (बीएमसी) -७०,८४२, मुंबई (डीवायडी)-३९,३५१, नागपूर-१६,४४० , नांदेड - १०,६५१, नंदूरबार -४,४८४, नाशिक -४७,२०२, उस्मानाबाद ८०१३, पालघर - २३,३३९, परभणी - ६,६०९, पुणे- ७३,८३८ , रायगड - १६,६५८ , रत्नागिरी- १३,९६९, सांगली-१७,८३३, सातारा -४१,२३३, सिंधूदूर्ग- ६,८०४ , सोलापूर - २२,२५४, ठाणे -३९,२२१, वर्धा- १०,९९१, वाशिम-५,३७२, यवतमाळ - ९,०२९

----

निवासस्थानाची माहिती देऊन सर्वेक्षणात भाग घेणारे पालक

ग्रामीण - ३,०५,२४५

निमशहरी -७१,९०४

शहरी - ३,१३,६६८

एकूण - ६,९०,८२०

---------