शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

मुलींचे शिक्षण, आरोग्य, संस्कार हीच पालकांची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:33 IST

सुनंदा पवार : तावशी येथे माता पालकांशी संवाद

बारामती : मुलींचे शिक्षण, आरोग्य, संस्कार हीच खरी संपत्ती समजून महिला पालकांनी मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन ‘स्वस्थ कन्या, स्वस्थ भारत’ अभियानाच्या प्रमुख सुनंदा पवार यांनी केले. अभियानांतर्गत इंदापूर तालुक्यातील तावशी येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होत्या.

माता पालकांशी संवाद साधताना पवार म्हणाल्या, ‘‘मासिक पाळीबाबत ग्रामीण भागातील महिला आणि मुली यांच्यात संवाद नसल्याने वयात आलेल्या मुलींच्या आरोग्याच्या अनेक अडचणी आहेत. याच अडचणी लक्षात घेऊन अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती या संस्थेच्यावतीने हे अभियान पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. बारामती, पुरंदर, इंदापूर या तीन तालुक्यांतील १५० शाळा आणि ४० हजार मुलींपर्यंत हे अभियान पोहोचले आहे. महिलांचे आरोग्य उत्तम असेल तर मन प्रसन्न राहते. परिणामी घर, कुटुंब आणि परिसर सुंदर आणि स्वच्छ राहतो. सामाजिक जाणिवा लक्षात घेता महिला आरोग्याविषयी आपल्याला मनापासून काम करणे गरजेचे आहे. सॅनिटरी नॅपकिन हा विषय महिला आरोग्यासाठी गरजेचा असताना त्याविषयी अनेक शंका निर्माण केल्या जातात. मुली वयात आल्यानंतर त्यांच्यात नैसर्गिक शारीरिक बदल होत असतात. हे बदल लक्षात घेता पालक म्हणून आपली जबाबदारी म्हणून काही कर्तव्य आपण पार पाडणे गरजेचे आहे.’ 

टॅग्स :Puneपुणे