शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

पालखी प्रस्थान होणार जुन्याच मार्गाने

By admin | Updated: July 20, 2015 03:56 IST

प्रशासनाने केलेली तयारी, अधिकारीवर्गाने केलेल्या शिष्टाईला मान देऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुन्याच मार्गाने ठेवण्याचा

इंदापूर : प्रशासनाने केलेली तयारी, अधिकारीवर्गाने केलेल्या शिष्टाईला मान देऊन संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जुन्याच मार्गाने ठेवण्याचा निर्णय पालखीप्रमुखांनी घेतला, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना उपनगराध्यक्ष भरत शहा, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे यांनी दिली.बारामतीचे प्रांताधिकारी संतोष जाधव, विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, तहसीलदार सूर्यकांत येवले, गटविकास अधिकारी डॉ. लहू वडापुरे, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या शिष्टमंडळाने आज (दि. १९) सायंकाळी निमगाव केतकी येथे जाऊन पालखीप्रमुखांची भेट घेतली. प्रस्थानाच्या रस्त्याच्या दुरुस्ती, स्वच्छतेच्या कामाची माहिती दिली. त्या रस्त्यावर पालखीच्या प्रस्थानाच्या वेळी फुले अंथरण्यात येणार आहेत. सुवासिक अत्तराची फवारणी करण्यात येणार आहे. कडेने झालर बसविण्यात येणार आहे. याचीही माहिती पालखीप्रमुखांना देण्यात आली. प्रस्थानाचा जुना मार्ग बदलू नये, अशी विनंती अधिकारीवर्गाच्या शिष्टमंडळाने केली. त्या विनंतीस मान देऊन प्रस्थानाचा जुना मार्ग कायम ठेवण्याचा निर्णय पालखीप्रमुखांनी घेतला. पुढच्या वर्षी परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान,आजच्या ‘लोकमत’मध्ये ‘पालखी नव्या मार्गाने नेण्यामध्ये पेच’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने खळबळ उडाली. पालखीच्या प्रस्थानाच्या मार्गावरून प्रस्थान करण्यास पालखीप्रमुखांनी नकार दिला होता. त्यामुळे भाविक नाराज होते. याच मुद्द्यावर पालखीप्रमुखांशी चर्चा केली. पालखी प्रस्थान पूर्वीच्या मार्गाने व्हावे. शेकडो वर्षांच्या परंपरेला छेद देऊ नये, पालखीप्रमुखांनी अट्टहासाचे धोरण सोडावे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावर पालखीप्रमुखांनी आम्ही रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुक्काम करून तेथूनच प्रस्थान करू. पुढच्या वर्षी निमगाव केतकी येथून सराटी मुक्कामाकडे जाऊ, अशी हेकट भूमिका स्वीकारल्यानंतर वादावादीला सुरुवात झाली. पालखीप्रमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास नाईलाजास्तव आम्हाला नेहरू चौकामध्ये आंदोलन करावे लागेल. अनुचित प्रकार घडल्यास त्यास पालखीप्रमुख जबाबदार राहतील, असा निर्वाणीचा इशारा शिष्टमंडळाने दिला. (वार्ताहर)