शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

तब्बल चार महिने सोसला पाकिस्तानचा अनन्वित छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:09 IST

‘मरू पण झुकणार नाही,’ अशी दुर्दम्य जिद्द बाळगत आम्ही पाकिस्ताननेकेलेला अनन्वित छळ सोसला.

मनोहर बोडखे।दौंड : ‘मरू पण झुकणार नाही,’ अशी दुर्दम्य जिद्द बाळगत आम्ही पाकिस्ताननेकेलेला अनन्वित छळ सोसला. पाकिस्तानच्या सैन्याने हालहाल करून मारहाण केली, पण देशाची मान आम्ही खाली होऊ दिली नाही, हे शब्द आहेत दौंड तालुक्यातील नानवीज या गावी राहणाºया दिनकर पाटोळे या सैनिकाचे.देशाचे संरक्षण करीत असताना १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूराष्ट्राबरोबर दोन हात करता करता पाकिस्तान सैन्याने सहा भारतीय जवानांना पकडले होते. त्यातील एक जवान म्हणजे दिनकर पाटोळे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी पाकिस्तानने केलेल्या छळवादाची कहाणी कथन केली. पाकिस्तानच्या कैदेत तब्बल ४ महिने आणि २१ दिवस त्यांना राहावे लागले. अंगावर शहारे येतील, असे अत्याचार त्यांनी सहन केले. १९६५ ला पाटोळे यांच्यासह अन्य पाच जवान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानी सैन्याशी लढा देत होते. पहाटे ४ वाजता पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले आणि कैद केले. पाटोळे सांगत होते, पाकिस्तानमधील दुरगाई किल्ल्यात आम्हाला ठेवण्यात आले. या किल्ल्यात खूप भारतीय कैदी होते. दहा बाय दहाच्या खोलीत ५०-५० भारतीय कैदी बंदिवासात होते. रायफलचा मार खाल्ल्यानंतर आम्हाला जेवण मिळायचे. भारतीय सैन्यासह लष्कराच्या छावण्यांची माहिती विचारली जायची; परंतु आम्ही देशाशी कोणतीही गद्दारी केली नाही. दिवसेंदिवस अत्याचार वाढत गेले. भाकरीमध्ये चुना घालून द्यायचे. ते जेवल्यानंतर पोटात आग व्हायची. भाकरी खाल्ली नाही तर मारहाण व्हायची. त्या साडेचार महिन्यांत किती चुना पोटात गेला असेल, याला सीमा नाही. त्या किल्ल्यात बाराशेच्या जवळपास भारतीय कैदी होते. इतक्या कैद्यांसाठी एक स्वच्छतागृह आणि अंघोळीसाठी एकच नळ होता. मातृभूमीच्या प्रेमाखातर आम्ही सारा छळ मूकपणाने सहन केला.युद्ध संपले तरी पाटोळे यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. सैन्य दलात लागत नव्हता. महिन्याभरानंतर सैन्य दलातून एक जवान नानवीज येथे सैनिकी पोशाख घेऊन आला आणि म्हणाला, दिनकर पाटोळे यांचा ठावठिकाणा नाही, मात्र रक्ताने बरबटलेला त्यांचा पोशाख सापडला आहे. कदाचित पाटोळे देशाच्या संरक्षणार्थ शहीद झाले असावेत. नानवीज गावावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र पत्नी तुळसाबाई यांचा त्यावर विश्वास नव्हता. त्यानंतरही त्यांनी कपाळावरचे कुंकू पुसले नाही. अखेर ६ भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा सुगावा भारतीय सैन्य दलाला लागला. वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा झाला आणि या ६ जणांची सुटका झाली. तालुक्यासह नानवीज गावात आनंदोत्सव झाला. सैन्य दलातील १५ वर्षांच्या सेवेनंतर आता वयाच्या पंचाहत्तरीत असलेले पाटोळे मुले, सुना, नातवंडे यांच्यासमवेत आनंदी आयुष्य जगत आहेत.पदरी मात्र फसवणूक आली...देश संरक्षणात जिवाची पर्वा न करता सेवा केली. त्याबद्दल मला शासनाने ५ एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. तीन वर्षे या जमिनीत शेती केली. नंतर सदरची जमीन पुनर्वसनाची आहे, असे शासनाने सांगितले व ती जमीन परत घेतली. त्यानंतर शासनदरबारी कितीतरी पायºया झिजवल्या, परंतु पदरी काहीच पडले नाही, अशी खंत दिनकर पाटोळे यांनी व्यक्त केली.