शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल चार महिने सोसला पाकिस्तानचा अनन्वित छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:09 IST

‘मरू पण झुकणार नाही,’ अशी दुर्दम्य जिद्द बाळगत आम्ही पाकिस्ताननेकेलेला अनन्वित छळ सोसला.

मनोहर बोडखे।दौंड : ‘मरू पण झुकणार नाही,’ अशी दुर्दम्य जिद्द बाळगत आम्ही पाकिस्ताननेकेलेला अनन्वित छळ सोसला. पाकिस्तानच्या सैन्याने हालहाल करून मारहाण केली, पण देशाची मान आम्ही खाली होऊ दिली नाही, हे शब्द आहेत दौंड तालुक्यातील नानवीज या गावी राहणाºया दिनकर पाटोळे या सैनिकाचे.देशाचे संरक्षण करीत असताना १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शत्रूराष्ट्राबरोबर दोन हात करता करता पाकिस्तान सैन्याने सहा भारतीय जवानांना पकडले होते. त्यातील एक जवान म्हणजे दिनकर पाटोळे. स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी पाकिस्तानने केलेल्या छळवादाची कहाणी कथन केली. पाकिस्तानच्या कैदेत तब्बल ४ महिने आणि २१ दिवस त्यांना राहावे लागले. अंगावर शहारे येतील, असे अत्याचार त्यांनी सहन केले. १९६५ ला पाटोळे यांच्यासह अन्य पाच जवान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तानी सैन्याशी लढा देत होते. पहाटे ४ वाजता पाकिस्तानी सैन्याने त्यांना पकडले आणि कैद केले. पाटोळे सांगत होते, पाकिस्तानमधील दुरगाई किल्ल्यात आम्हाला ठेवण्यात आले. या किल्ल्यात खूप भारतीय कैदी होते. दहा बाय दहाच्या खोलीत ५०-५० भारतीय कैदी बंदिवासात होते. रायफलचा मार खाल्ल्यानंतर आम्हाला जेवण मिळायचे. भारतीय सैन्यासह लष्कराच्या छावण्यांची माहिती विचारली जायची; परंतु आम्ही देशाशी कोणतीही गद्दारी केली नाही. दिवसेंदिवस अत्याचार वाढत गेले. भाकरीमध्ये चुना घालून द्यायचे. ते जेवल्यानंतर पोटात आग व्हायची. भाकरी खाल्ली नाही तर मारहाण व्हायची. त्या साडेचार महिन्यांत किती चुना पोटात गेला असेल, याला सीमा नाही. त्या किल्ल्यात बाराशेच्या जवळपास भारतीय कैदी होते. इतक्या कैद्यांसाठी एक स्वच्छतागृह आणि अंघोळीसाठी एकच नळ होता. मातृभूमीच्या प्रेमाखातर आम्ही सारा छळ मूकपणाने सहन केला.युद्ध संपले तरी पाटोळे यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. सैन्य दलात लागत नव्हता. महिन्याभरानंतर सैन्य दलातून एक जवान नानवीज येथे सैनिकी पोशाख घेऊन आला आणि म्हणाला, दिनकर पाटोळे यांचा ठावठिकाणा नाही, मात्र रक्ताने बरबटलेला त्यांचा पोशाख सापडला आहे. कदाचित पाटोळे देशाच्या संरक्षणार्थ शहीद झाले असावेत. नानवीज गावावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र पत्नी तुळसाबाई यांचा त्यावर विश्वास नव्हता. त्यानंतरही त्यांनी कपाळावरचे कुंकू पुसले नाही. अखेर ६ भारतीय जवान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा सुगावा भारतीय सैन्य दलाला लागला. वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा झाला आणि या ६ जणांची सुटका झाली. तालुक्यासह नानवीज गावात आनंदोत्सव झाला. सैन्य दलातील १५ वर्षांच्या सेवेनंतर आता वयाच्या पंचाहत्तरीत असलेले पाटोळे मुले, सुना, नातवंडे यांच्यासमवेत आनंदी आयुष्य जगत आहेत.पदरी मात्र फसवणूक आली...देश संरक्षणात जिवाची पर्वा न करता सेवा केली. त्याबद्दल मला शासनाने ५ एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. तीन वर्षे या जमिनीत शेती केली. नंतर सदरची जमीन पुनर्वसनाची आहे, असे शासनाने सांगितले व ती जमीन परत घेतली. त्यानंतर शासनदरबारी कितीतरी पायºया झिजवल्या, परंतु पदरी काहीच पडले नाही, अशी खंत दिनकर पाटोळे यांनी व्यक्त केली.