शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पाकिस्तान विश्वासघातकी देश : विनायक पाटणकर

By admin | Updated: November 15, 2016 03:41 IST

काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. हा देश विश्वास ठेवण्यासारखा नाही, असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर

पुणे : काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाला, तरी पाकिस्तान खोड्या करण्याचे थांबवणार नाही. हा देश विश्वास ठेवण्यासारखा नाही, असे मत लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांनी व्यक्त केले.शब्दसखी तर्फे ‘काश्मीर प्रश्न : समज आणि गैरसमज’ या विषयावर सोमवारी त्यांचे व्याख्यान झाले. पाटणकर म्हणाले, ‘‘काश्मीरचा प्रश्न हा पाकिस्तानसाठी जीवनवाहिनी आहे. पाकिस्तानी जनता एका मुद्द्यावर एकत्र यावी, यासाठी काश्मीर प्रश्नाची निर्मिती पाकिस्तानकडून करण्यात आली. या देशाचा बहुतांश समाज हा जमीनदार असून काश्मिरी भूभाग पाकिस्तानला हवा आहे. काश्मिरी नागरिकांप्रति पाकिस्तानला फारसा कळवळा नाही. काश्मीरच्या पाण्याची त्याला खऱ्या अर्थाने गरज आहे. पाकिस्तानचे सैन्यच हे त्या देशाचे सर्वेसर्वा असून, लोकशाही फक्त नावालाच आहे. त्यांच्या सैन्यावर जास्त खर्च केला जातो. त्यामुळे आपल्यासमोरचा शत्रू हा सक्षम असून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.’’काश्मीरबाबतच्या गैरसमजांबाबत ते म्हणाले, ‘‘काश्मिरी लोक पाकिस्तानधार्जिणे आहेत. त्यांना स्वातंत्र्य हवे आहे, असे समजणे अत्यंत चुकीचे आहेत. २००१च्या सर्वेक्षणानुसार ८० टक्के काश्मिरी नागरिक भारतासोबत यायला तयार आहेत. तेथील लोकांना शिक्षण हवे आहे, रोजगार हवा आहे. त्यांना भारतातच चांगले आयुष्य हवे आहे. बेरोजगारी व गरिबीमुळे काश्मीरमधील तरुण दहशतवादाकडे वळतात. त्यामुळे काश्मिरी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे.’’ (प्रतिनिधी)