शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

स्कॅनरलाही चकवा देणारे चरसचे पॅकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

पुणे : हिमाचल प्रदेशातील मनालीच्या आसपासच्या गावांमधून चरसची लागवड केली जाते. तेथून हा माल सायलेन्समधून दिल्लीपर्यंत आणला जातो. दिल्लीतून ...

पुणे : हिमाचल प्रदेशातील मनालीच्या आसपासच्या गावांमधून चरसची लागवड केली जाते. तेथून हा माल सायलेन्समधून दिल्लीपर्यंत आणला जातो. दिल्लीतून रेल्वेमागे संपूर्ण देशभरात पोहचवला जातो. या चरसचा प्रवास पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी उलघडला.

हिमाचल प्रदेशातील मनाली येथून ४० किमी दूर असलेल्या मनाला गावातून हा माल रसेल, कुलु, तोश, झलांममार्गे कसोल येथे येतो. तेथे या मालाची पॅकिंग होते. दुचाकीला दोन सायलेन्सर असतात. त्यातील एका रिकाम्या सायलेन्सरमध्ये हा माल भरला जातो. तेथून तो दिल्लीला आणण्यात येतो. तेथे सायलेन्सर फोडला जातो. तो दिल्लीतून रेल्वेने देशभरात पाठविला जातो. पुण्यात हा कोणाला माल द्यायचा याची माल घेऊन येणार्यांना माहिती नसते. ते ठरलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर ते संबंधितांना कळवितात. पण ते प्रमुख पुण्यात माल पोहचला आहे, हे माल घेणार्यांना सांगतात. त्यानंतर त्यांची खात्री पटल्यानंतर ते संबंधितांना भेटून मालाची डिलिव्हरी करतात. ललितकुमार हा मुख्य सुत्रधार असून तो यापूर्वी अनेकदा पुण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या अमली पदार्थाचा माग करण्यासाठी गेली १ महिना ४ पोलीस अधिकारी प्रयत्नशील होते. त्यातूनही गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती पोलिसांना मिळाली.

मुंबईत ४ ठिकाणी जाणार होता माल

पुण्यात आलेल्या या मालापैकी २२ किलो मुंबईतील ४ ठिकाणी जाणार होता. त्यानंतर तो अन्य ठिकाणी जाणार होता. त्याचा तपास मुंबई पोलीस व नायकोटिस ब्युरोमार्फत करण्यात येत आहे.

* हा चरस एका विशिष्ठ पद्धतीने ते पॅकिंग केले जाते. त्यामुळे सेन्सर टेक्नॉलॉजीला हे पॅकिंग चकवा देते. स्कॅनरमध्ये तपासणी केले तर या पॅकेटमध्ये चरस असल्याचे दिसून येत नाही, असे सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.