शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

स्कॅनरलाही चकवा देणारे चरसचे पॅकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

पुणे : हिमाचल प्रदेशातील मनालीच्या आसपासच्या गावांमधून चरसची लागवड केली जाते. तेथून हा माल सायलेन्समधून दिल्लीपर्यंत आणला जातो. दिल्लीतून ...

पुणे : हिमाचल प्रदेशातील मनालीच्या आसपासच्या गावांमधून चरसची लागवड केली जाते. तेथून हा माल सायलेन्समधून दिल्लीपर्यंत आणला जातो. दिल्लीतून रेल्वेमागे संपूर्ण देशभरात पोहचवला जातो. या चरसचा प्रवास पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी उलघडला.

हिमाचल प्रदेशातील मनाली येथून ४० किमी दूर असलेल्या मनाला गावातून हा माल रसेल, कुलु, तोश, झलांममार्गे कसोल येथे येतो. तेथे या मालाची पॅकिंग होते. दुचाकीला दोन सायलेन्सर असतात. त्यातील एका रिकाम्या सायलेन्सरमध्ये हा माल भरला जातो. तेथून तो दिल्लीला आणण्यात येतो. तेथे सायलेन्सर फोडला जातो. तो दिल्लीतून रेल्वेने देशभरात पाठविला जातो. पुण्यात हा कोणाला माल द्यायचा याची माल घेऊन येणार्यांना माहिती नसते. ते ठरलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर ते संबंधितांना कळवितात. पण ते प्रमुख पुण्यात माल पोहचला आहे, हे माल घेणार्यांना सांगतात. त्यानंतर त्यांची खात्री पटल्यानंतर ते संबंधितांना भेटून मालाची डिलिव्हरी करतात. ललितकुमार हा मुख्य सुत्रधार असून तो यापूर्वी अनेकदा पुण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

या अमली पदार्थाचा माग करण्यासाठी गेली १ महिना ४ पोलीस अधिकारी प्रयत्नशील होते. त्यातूनही गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती पोलिसांना मिळाली.

मुंबईत ४ ठिकाणी जाणार होता माल

पुण्यात आलेल्या या मालापैकी २२ किलो मुंबईतील ४ ठिकाणी जाणार होता. त्यानंतर तो अन्य ठिकाणी जाणार होता. त्याचा तपास मुंबई पोलीस व नायकोटिस ब्युरोमार्फत करण्यात येत आहे.

* हा चरस एका विशिष्ठ पद्धतीने ते पॅकिंग केले जाते. त्यामुळे सेन्सर टेक्नॉलॉजीला हे पॅकिंग चकवा देते. स्कॅनरमध्ये तपासणी केले तर या पॅकेटमध्ये चरस असल्याचे दिसून येत नाही, असे सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.