शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

ओवेसी, आरएसएस एकाच नाण्याच्या बाजू- दिग्विजयसिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:37 IST

पुढील निवडणूक विचारधारेवर; धार्मिक उन्माद पसरवल्याचा आरोप

पुणे : ओवेसी मुस्लिमांमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करीत असतात. तोच प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत असतो. पुढील निवडणूक व्यक्तिकेंद्रित नसेल, तर विचारधारेवर लढवली जाईल. महात्मा गांधी की हेडगेवार, गोळवलकर? यातून निवड करावी लागेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केले.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शन घेऊन आल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस, भाजपा, केंद्र सरकार व अन्य विविध मुद्द्यांवर भाष्य केले. देशात धार्मिक उन्माद पसरवला जात आहे, असा आरोप करून ते म्हणाले, ‘‘शशी थरूर यांनी ‘हिंदू पाकिस्तान’ शब्द वापरला तो बरोबर आहे. तिथे ज्याप्रमाणे धार्मिक भावना भडकावण्याचे काम सुरू आहे तसेच इथेही करण्याचा प्रयत्न आहे. मी हिंदू आहे; पण राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाला हिंदूंची संघटना मानत नाही. माझा अहिंसवेर विश्वास आहे. देशालाही अहिंसाच मान्य आहे.’’काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेल्या मिठीचे दिग्विजयसिंह यांनी समर्थन केले. यापूर्वीही संसद सदस्य अशी भेट घेत होते, हस्तांदोलन करीत होते, असे ते म्हणाले. राहुल त्यांची नवी टीम तयार करीत आहेत. अशी टीम त्यांनी तयार करावी, असे आपणच त्यांना सुचवले होते, असे ते म्हणाले.

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी