शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

रब्बी पिकांसाठी १८ लाखांहून अधिक अर्ज; ठाणे, पालघर जिल्ह्यातून अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:46 IST

रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत.

पुणे : रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत. यातून १३ लाख ३७ हजार ३३६ हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र तर सुमारे साडेपाच हजार कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे.

 परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक २ लाख ७४ हजार अर्ज आले आहेत. पुणे विभागातून २ लाख ४२ हजार ५९७ तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आला नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षित क्षेत्रात किमान १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज अद्याप आलेला नाही. रायगडमधून एक, रत्नागिरीमधून पाच तर सिंधुदुर्गमधून सहा अर्ज आले आहेत.

विभागनिहाय अर्जांची संख्या

कोकण  १२

नाशिक  १,२२,७७६

पुणे    २,४२,५९७

कोल्हापूर ५३,४०४

छ. संभाजीनगर  ४,४५,९०३

लातूर   ७,२२,१७९

अमरावती       २,५८,७०६

नागपूर  ३४,२४५

एकूण   १८,७९,८२२

लातूरमधून सर्वाधिक

लातूर विभागातून सर्वाधिक ७ लाख २२ हजार ११९ अर्ज आले आहेत.

एकूण अर्जांमुळे राज्याला ३६ कोटी तर केंद्र सरकारला २१८ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे.

राज्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामात एकूण ७१ लाख ८७ हजार १८२ अर्ज आले होते.