शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रब्बी पिकांसाठी १८ लाखांहून अधिक अर्ज; ठाणे, पालघर जिल्ह्यातून अर्ज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:46 IST

रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत.

पुणे : रब्बी हंगामातील पिकांसाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे. पीक विमा काढण्यासाठी १५ डिसेंबरची अंतिम मुदत असून, राज्यात आतापर्यंत १८ लाख ७९ हजार ८२२ अर्ज आले आहेत. यातून १३ लाख ३७ हजार ३३६ हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र तर सुमारे साडेपाच हजार कोटींची रक्कम विमा संरक्षित झाली आहे.

 परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक २ लाख ७४ हजार अर्ज आले आहेत. पुणे विभागातून २ लाख ४२ हजार ५९७ तर ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आला नसल्याचे कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. तसेच उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. यंदा अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बी पिकांवर आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विमा संरक्षित क्षेत्रात किमान १० टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

ठाणे व पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज अद्याप आलेला नाही. रायगडमधून एक, रत्नागिरीमधून पाच तर सिंधुदुर्गमधून सहा अर्ज आले आहेत.

विभागनिहाय अर्जांची संख्या

कोकण  १२

नाशिक  १,२२,७७६

पुणे    २,४२,५९७

कोल्हापूर ५३,४०४

छ. संभाजीनगर  ४,४५,९०३

लातूर   ७,२२,१७९

अमरावती       २,५८,७०६

नागपूर  ३४,२४५

एकूण   १८,७९,८२२

लातूरमधून सर्वाधिक

लातूर विभागातून सर्वाधिक ७ लाख २२ हजार ११९ अर्ज आले आहेत.

एकूण अर्जांमुळे राज्याला ३६ कोटी तर केंद्र सरकारला २१८ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे.

राज्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामात एकूण ७१ लाख ८७ हजार १८२ अर्ज आले होते.