शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लसीकरण केंद्र बंद असल्याने उत्तमनगरमध्ये तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:15 IST

लसीकरणामुळे कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. असे असतानादेखील लसींचा पुरवठाच रोखल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. कोरोनाचा ...

लसीकरणामुळे कोरोनावर पूर्णपणे मात करू शकतो. असे असतानादेखील लसींचा पुरवठाच रोखल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लसीकरणाचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. परंतु असे असताना लसच मिळत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

कोरोनामुळे सर्वत्र मृत्यूचे तांडव चालले असताना लसीकरणामुळे कोरोना रोखण्यास मदत मिळेल. कोरोनाचा संसर्ग झालाच तरी त्याचे परिणाम एवढे गंभीर नसणार आहेत. सरकारने गंभीर दखल घेऊन लसीकरणाची मोहीम अजूनही मोठ्या प्रमाणात राबवावी, असे अनेकांचे म्हणणे आहे.

शिवणे-उत्तमनगर भागात अतुल दांगट ह्यांच्याबरोबर संपर्क केला असता त्यांनी माहिती दिली की, लसीकरणाचे प्रमाण वाढवायची गरज असताना गेल्या चार दिवसांत लसीकरण पूर्णपणे बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तरी प्रशासनाने हस्तक्षेप करून लवकरात लवकर लसींचा पुरवठा पूर्ववत करावा.