शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मैदानी खेळ होताहेत नामशेष, मैदाने उपलब्ध होणे झाले कठीण, मुले मोबाइलच्या आहारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 02:08 IST

रावेत : उपनगरातील अपार्टमेंट व बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे.

रावेत : उपनगरातील अपार्टमेंट व बंगल्यांच्या वाढत्या संख्येमुळे खेळासाठी पुरेशी मैदाने उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जी मैदाने उपलब्ध आहेत त्यांना बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. यामुळे घरासमोरील रस्तेच चिमुकल्यांसाठी खेळपट्टी झाले आहे. मुलांना आपल्या आवडी आता घरातच शोधत बसावे लागत आहे. मैदाने नसल्याने मोबाइलवरील गेम खेळण्यास मुले प्राधान्य देत आहेत.शहरात खेळण्यासाठी मैदानेच नसल्याने नाईलाजाने मुलांना क्रिकेट असो वा फुटबॉल हे मैदानी खेळ रस्त्यावरच खेळावे लागत आहेत. रस्त्यावर अपघात होतात म्हणून अनेक जणांना इच्छेला मुरड देत सक्तीने कॉम्प्युटर गेम खेळतात. मातीमध्ये खेळताना पडणे, खरचटणे, त्यातून शिकण्याचा अनुभव मिळणे आता विरळच़ त्यामुळे इमारतीच्या बाहेरील रस्त्यांवरील दुपारी किंवा रात्री वाहनांची गर्दी कमी असली की, खेळायचे असा चिमुकल्यांचा सुटीतील दिनक्रम बनू लागला आहे.>दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्यापेक्षा पालक मुलांना बैठे खेळ खेळायला सांगतात. सध्या चिमुकल्यांना बैठे खेळांमध्ये सर्वात जास्त बुद्धिबळ आणि कॅरम खेळायला आवडते. सापशिडी काहीप्रमाणात हरवत असून त्याची जागा वैज्ञानिक आणि बौद्धिक खेळांनी घेतल्याचे दिसून आले आहे. मैदानावर जाऊन मातीत खेळणे, रस्त्यावर किंवा बागेत जाऊन धिंगाणा घालण्यापेक्षा घरात बसून कॉम्प्युटरवरील गेम्स खेळण्याकडे २५ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांचा कल आहे. कॉम्प्युटर गेम्स येण्यापूर्वी व्हीडिओ गेम्स मोठ्या प्रमाणात खेळले जात होते. त्यामुळे डोळ्यांचे विकार होऊ लागले आहेत. त्यामुळे लहान मुलांना चष्मा हा फार कमी वयात लागतो हे प्रमाण ३0 टक्के आढळते. विद्यार्थ्यांचे डोळ्यांच्या आजाराने अभ्यासावरील लक्ष विचलित होत आहे.आयपीएलसारख्या स्पर्धेमुळे चिमुकल्यांचा कल मैदानी खेळ खेळण्याकडे वाढत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने, क्रिकेट, फुटबॉल तर इनडोअर गेम्समध्ये बॅडमिंटन आणि टेनिस खेळायची क्रेझ वाढली आहे. परंतु पुरेशी मैदाने नसल्याने त्यांच्या आवडीला वाव मिळेनासा झाला आहे.शहरात मैदानांची संख्या कमी झाल्याने मुलांचा मैदानात खेळण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे. नाईलाजाने कॉलनीच्या कोपºयात घरासमोरील रस्त्यावर मुलांना जीव धोक्यात घालून खेळावे लागत आहे. शहरात अजूनही बोटावर मोजता येतील एवढीच मोठी मैदाने तग धरून आहेत. त्यामुळे या ठिकाणी सर्वसामान्य मुलांना क्रिकेट किंवा इतर खेळ खेळण्यास द्यावे. काही मैदाने शहरात आहेत त्याचा महापालिकेने विकास करावा, अशी मागणी होत आहे.