शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धुक्यांमुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:26 IST

मागील आठ दिवसांपासून वातावरणातील बदलाचा अनुभव येत आहे. सुरुवातीला कडाक्याची थंडी पडली. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसा कडक ...

मागील आठ दिवसांपासून वातावरणातील बदलाचा अनुभव येत आहे. सुरुवातीला कडाक्याची थंडी पडली. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसा कडक उन व रात्री पाऊस व संमिश्र वातावरण असे विचित्र वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र आज पहाटे पासून पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज पहाटे पडलेले धुके सकाळी साडेआठ वाजेपर्यंत कायम होते. हे धुके नगदी पिके तसेच फळबागांसाठी व भाजीपाला पिके विशेषता कांदा, बटाटा, धना, मेथी या भाजीपाला पिकांना नुकसानीचे ठरणार आहे.

याबाबत माहिती देताना महेश मोरे म्हणाले फळबागांमध्ये द्राक्ष पिकाचे धूक्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. तसेच आंबा पिकालाही फटका बसणार आहे. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. दिवसा कडक उन पडत असल्याने रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तुडतुडे, आळी यांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना तो रोखण्यासाठी चांगलेच प्रयत्न करावे लागतील. कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. सातगाव पठार भागात ज्वारी पीक जोमदार आले होते. मात्र अवकाळी पडलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतातच आडवे झाले आहे. हे ज्वारी पीक हातातोंडाशी आले असता त्याचे नुकसान होऊन शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे.बुरशीजन्य रोग पिकावर पडू लागल्यानंतर शेतकऱ्यांना वेळोवेळी महागडी औषध फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे भांडवली खर्चात वाढ होणार असल्याची माहिती शेतकरी बाळासाहेब पिंगळे यांनी दिली. धूक्याचा प्रादुर्भाव दूर व्हावा अशी अशा शेतकऱ्यांना आहे.

११ मंचर

११ मंचर १

धुके पडू लागल्याने पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.