शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पाण्याअभावी भातावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश ...

डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी तर भात शिवारं पिवळी पडू लागली असून भातखाचरांतील पाणी आटून गेले आहे. त्यामुळे भातशेती संकटाच्या छायेत आली असून याचा उत्पादनावर परिणार होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यामध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. या भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जून, जुलैच्या दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भातलागवडीची कामे सुरू असल्याचे पहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेली भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्रे तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो.

पुणे जिल्ह्यातील भातशेतीला यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली साथ दिली. पेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्यवेळी तयार झाली होती. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आणि भातशेतीचे नुकसान झाले मात्र याच पावसावर भात लागवडीही उरकल्याने यंदा भातउत्पादक शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण पाहवयास मिळत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी भातशेतीला करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होवू लागल्याचे चित्र आहे. आंबेगांव तालुक्याच्या फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे तर खाचरांतील पाणी आटून गेल्याने खाचरांमध्ये चिरा पडू लागल्या आहेत. भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होवू लागले आहे. भात उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र आसणाऱ्या जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने काढता पाय घेतल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती संकटाच्या छायेखाली येवू लागली आहे.

२५डिंभे

पावसाअभावी भात खाचरांतील पाणी आटू लागल्याने खाचरांना चिरा पडल्या आहेत. (छायाचित्र- कांताराम भवारी)