शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

पाण्याअभावी भातावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश ...

डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी तर भात शिवारं पिवळी पडू लागली असून भातखाचरांतील पाणी आटून गेले आहे. त्यामुळे भातशेती संकटाच्या छायेत आली असून याचा उत्पादनावर परिणार होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यामध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. या भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जून, जुलैच्या दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भातलागवडीची कामे सुरू असल्याचे पहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेली भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्रे तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो.

पुणे जिल्ह्यातील भातशेतीला यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली साथ दिली. पेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्यवेळी तयार झाली होती. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आणि भातशेतीचे नुकसान झाले मात्र याच पावसावर भात लागवडीही उरकल्याने यंदा भातउत्पादक शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण पाहवयास मिळत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी भातशेतीला करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होवू लागल्याचे चित्र आहे. आंबेगांव तालुक्याच्या फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे तर खाचरांतील पाणी आटून गेल्याने खाचरांमध्ये चिरा पडू लागल्या आहेत. भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होवू लागले आहे. भात उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र आसणाऱ्या जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने काढता पाय घेतल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती संकटाच्या छायेखाली येवू लागली आहे.

२५डिंभे

पावसाअभावी भात खाचरांतील पाणी आटू लागल्याने खाचरांना चिरा पडल्या आहेत. (छायाचित्र- कांताराम भवारी)