शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी भातावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश ...

डिंभे : उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या भातापिकावर करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. काही ठिकाणी तर भात शिवारं पिवळी पडू लागली असून भातखाचरांतील पाणी आटून गेले आहे. त्यामुळे भातशेती संकटाच्या छायेत आली असून याचा उत्पादनावर परिणार होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर व पुरंदर या तालुक्यामध्ये जवळपास ६३ हजार हेक्टर क्षेत्रावर दरवर्षी भाताचे उत्पादन घेतले जाते. या भागातील भातशेती ही संपूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जून, जुलैच्या दरम्यान या भागात मोठ्या प्रमाणात भातलागवडीची कामे सुरू असल्याचे पहावयास मिळते. जुलै अखेरपर्यंत भातलागवडीची कामे उरकली जातात. लागवड केलेली भातक्षेत्र तयार होण्यासाठी साडेतीन ते चार महिन्यांचा कालाधी लागतो. आक्टोबर महिन्यापर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात पिवळेधमक भातक्षेत्रे तयार होऊन जिर, रायभोग, इंद्रायणी, साळ, कोलम इत्यादी जातीच्या भातशेतीचा एक वेगळा सुगंध परिसरात दरवळत असतो.

पुणे जिल्ह्यातील भातशेतीला यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने चांगली साथ दिली. पेरणीच्या वेळेस योग्य वेळी पाऊस झाल्याने अनेक ठिकाणची भात रोपे लावडीसाठी योग्यवेळी तयार झाली होती. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढला आणि भातशेतीचे नुकसान झाले मात्र याच पावसावर भात लागवडीही उरकल्याने यंदा भातउत्पादक शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण पाहवयास मिळत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी भातशेतीला करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव होवू लागल्याचे चित्र आहे. आंबेगांव तालुक्याच्या फुलवडे, बोरघर, अडिवरे, कोंढवळ, पाटण, कुशिरे, महाळुंगे, पोखरी, चिखली या भागातील भातशेती पिवळी पडू लागली आहे तर खाचरांतील पाणी आटून गेल्याने खाचरांमध्ये चिरा पडू लागल्या आहेत. भात उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार होवू लागले आहे. भात उत्पादनाचे प्रमुख क्षेत्र आसणाऱ्या जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाने काढता पाय घेतल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती संकटाच्या छायेखाली येवू लागली आहे.

२५डिंभे

पावसाअभावी भात खाचरांतील पाणी आटू लागल्याने खाचरांना चिरा पडल्या आहेत. (छायाचित्र- कांताराम भवारी)