शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

आमची जिंदगी ‘उपरवाले के भरोसे’!

By admin | Updated: December 8, 2015 00:17 IST

अच्छी तनखा हात में नही आती, फिरभी घर चलाने के लिए जान जोखीम में डालनी पडती है, हमारी रक्षा तो उपरवालेके हात में है, उसीके भरोसे जिंदगी गुजर रही है...

पुणे : अच्छी तनखा हात में नही आती, फिरभी घर चलाने के लिए जान जोखीम में डालनी पडती है, हमारी रक्षा तो उपरवालेके हात में है, उसीके भरोसे जिंदगी गुजर रही है... ही व्यथा आहे तुटपुंज्या पगारावर असुविधांशी लढणाऱ्या सुरक्षारक्षकांची. सुरक्षा इमारती, आस्थापने, कार्यालये, दुकाने, एटीएम सेंटर अशा ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले जातात. या मालमत्तांच्या आणि स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री उपलब्ध नाही. सुरक्षा मंडळाचा (गार्ड बोर्ड) कायदा अस्तित्वात असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. एखादी काठी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या भरवशावर सगळी सुरक्षा व्यवस्था अवलंबून असल्याचेही यातून स्पष्ट झाले. घटना घडून गेल्यानंतर सीसीटीव्हीचा उपयोग होतो. अशा घटना घडूच नयेत, यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. कोणत्याही मालमत्तेची सुरक्षा नितांत गरजेची असते. त्यास हानी पोहोचू नये, यासाठी विविध प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा राबविण्यात येतात. या यंत्रणेमध्ये रक्षकांची जबाबदारी महत्त्वाची मानली जाते. मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सदैव तत्पर राहणे गरजेचे असते. मात्र, एखादा हल्ला झालाच कोणतेही हत्यार नसल्याने प्रतिकार करणे अशक्य होते. घटना घडून गेल्यानंतर त्याची तक्रार जवळील पोलीस ठाण्यात नोंदविण्याच्या सूचना केलेल्या असतात. पण, हल्ला रोखण्यासाठी लागणारी यंत्रणा नसल्याने सुरक्षा धोक्यात येते. सोसायट्यांमध्ये केवळ २-३ सुरक्षारक्षक नेमलेले असतात. सोसायटीमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची चोर अथवा अनोळखी व्यक्तींनी आत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रोखण्यासाठी किंवा स्वत:च्या बचावासाठी त्यांच्याकडे काहीच नसल्याचे दिसून आले.सुरक्षा एजन्सीतर्फे रक्षकांना महिन्यातून दोनदा प्रशिक्षण दिले जाते. आणीबाणीच्या वेळी नेमके काय करावे, दररोजचे कामकाज कसे पार पाडावे याबद्दलची माहिती प्रशिक्षणात दिली जाते. ‘सुरक्षा मंडळ’ कायद्यानुसार त्यांना महागाईभत्ता दिला जातो. मात्र एजन्सीतर्फे शस्त्रे, हत्यारे दिली जात नाहीत. - संदीप सुरवसे, एरिया आॅफिसर, आयएसएस एजन्सीबहुतांश सुरक्षारक्षक हे परराज्यातून आलेले असतात. त्यामुळे आमच्याकडे येथील कायमस्वरूपी रहिवास पुरावा नसतो. शासनाच्या निर्णयानुसार, कामगार मंडळाच्या सोयी व लाभ हे येथील रहिवाशांना मिळतात. मात्र आम्ही त्यापासून वंचित राहतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला मोठ्या शहरांकडे यावेच लागते. शासनाकडून सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत, तरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मग मिळेल ती नोकरी स्वीकारण्याशिवाय पर्याय नसतो. - अशोक कुमार राय, सुरक्षारक्षकसोसायट्या किंवा कार्यालयात सुरक्षारक्षकाची नोकरी असेल तर तेथे स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सोय असते, मात्र एखाद्या बांधकाम सुरू असलेल्या साईट्सवर किंवा एटीएमसारख्या सेंटरवर नेमणूक असेल तर स्वच्छतागृहांची, पिण्याच्या पाण्याची सोय नसते. अशा वेळी परिसरात ही अशी सोय उपलब्ध नसते. दूर असणाऱ्या स्वच्छतागृहात जायचे म्हटले तरी लोक सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचा आरडाओरडा करतात. अनेकदा आम्हाला पोटाचाही त्रास होतो. - लवकुश चौहान, सुरक्षारक्षक