शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

...आमच्या मुलांनाही शिकायचंय

By admin | Updated: November 15, 2016 03:26 IST

संपूर्ण जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यामुळे ऊस तोडण्यासाठी लागणारे कामगारही आपली घरदारे सोडून वेगवेगळ्या कारखान्यांवर दाखल झाली आहेत.

प्रशांत श्रीमंदिलकर/ पुणेसंपूर्ण जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यामुळे ऊस तोडण्यासाठी लागणारे कामगारही आपली घरदारे सोडून वेगवेगळ्या कारखान्यांवर दाखल झाली आहेत. ठेकेदारी पद्धतीने या कामगारांना परजिल्ह्यातून आणले जाते. या कामगारांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने हे कामगार आपले घरदार सोडून कामानिमित्त दाखल होतात. दरवर्षी ऊसतोड मजुरांची कुटुंबे ऊसतोडीसाठी दिवाळीपूर्वीच दाखल होतात. चालू हंगामात जवळपास साडेचारशे कुटुंबे स्थायिक झाली आहेत. काही साखर कारखान्यांनी जरी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा काढल्या असल्या, तरी त्या सगळ्या सुरू आहेतच असे नाही. याशिवाय या शाळांना जबाबदारी स्वीकारण्यास जिल्हा परिषद तयारी दाखवित नाही. त्यामुळे काही कारखान्यांवर शाळा सुरू, तर काही कारखान्यांवर बंद अशी अवस्था सध्या साखरशाळांची आहे. ऊसतोडणी कामगारांना आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन ते कामासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो. मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडून आपल्या आई-वडिसांसोबत यावे लागते. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही शिकता येत नाही. ही आता ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शोकांतिका बनली आहे.शौचालयांचा अभाव...ज्या वेळी ऊसतोडणी कामगार राहायला येतात, त्या वेळी त्यांना मूलभूत सुविधांसाठी झगडावेच लागते. प्रातर्विधीसाठी शौचालयांची सुविधाच नसल्याने महिलांना उघड्यावर जावे लागते. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे याचा परिसरातील आरोग्याची मोठी समस्या निर्माण होते.४शिवाय ऊसतोडणी कामगारांच्या राहण्यासाठी कुठलीही चांगली सोय नाही, त्यांचे तांडे दाखल झाले, की त्यांना झोपड्या बांधून राहावे लागते. कुडकुडत्या थंडीची पर्वा न करता हे कामगार भल्या पहाटे ऊस तोडणीसाठी जातात. त्यांना काही खाण्यापिण्याची पर्वा न करता ही कामे करावी लागतात. ४ऊसतोडणी कामगारांना सर्व सोयीसुविधा मिळतात की नाही, त्यांच्या आरोग्याबाबात, त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत संबंधित ठेकेदार अथवा कारखान्यांनी काही तशी सोय केली आहे की नाही? या गोष्टींची शहानिशा होणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगारांना सुविधा मिळणे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे.४साधारणत: दिवाळीनंतर ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर दाखल होतात. कायद्यानुसार ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर सोपविली; मात्र या शाळांकडून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. ४ऊसतोडणी कामागरांच्या मुलांच्या हक्काच्या शिक्षणासाठी प्रगत शिक्षण संस्था धावून आली आहे. जिल्ह्यातील १५ ते १६ साखर कारखान्यांवरील ऊसतोडणी कामगारांची हजारो मुले शाळेतच जात नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. आई-वडिलांसमवेत उसाच्या फडातच रमताना ती दिसत होती. ४ऊसतोडणी कामागरांच्या मुलांना रोज त्यांच्या घरी जाऊन नजीकच्या प्राथमिक शाळेत नेऊन बसविण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत आहेत. या संस्थेने नुकतेच सोमेश्वर कारखान्यावर काम चालू केले असून, आतापर्यंत ४० ते ५० ऊसतोडणी कामागारांची मुले नियमितपणे शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत.४ एप्रिल २०१०पासून नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार साखर कारखान्यांच्या व जनार्थ या संस्थेच्या साखरशाळा शासनाने बंद केल्या आणि ही जबाबदारी स्वत:वर घेतली होती. ४ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असतानाही सहा वर्षांपासून ही जबाबदारी पेलण्यात शासन अपयशी ठरले आहे.