शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

...आमच्या मुलांनाही शिकायचंय

By admin | Updated: November 15, 2016 03:26 IST

संपूर्ण जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यामुळे ऊस तोडण्यासाठी लागणारे कामगारही आपली घरदारे सोडून वेगवेगळ्या कारखान्यांवर दाखल झाली आहेत.

प्रशांत श्रीमंदिलकर/ पुणेसंपूर्ण जिल्ह्यातील कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. त्यामुळे ऊस तोडण्यासाठी लागणारे कामगारही आपली घरदारे सोडून वेगवेगळ्या कारखान्यांवर दाखल झाली आहेत. ठेकेदारी पद्धतीने या कामगारांना परजिल्ह्यातून आणले जाते. या कामगारांना उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्याने हे कामगार आपले घरदार सोडून कामानिमित्त दाखल होतात. दरवर्षी ऊसतोड मजुरांची कुटुंबे ऊसतोडीसाठी दिवाळीपूर्वीच दाखल होतात. चालू हंगामात जवळपास साडेचारशे कुटुंबे स्थायिक झाली आहेत. काही साखर कारखान्यांनी जरी ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळा काढल्या असल्या, तरी त्या सगळ्या सुरू आहेतच असे नाही. याशिवाय या शाळांना जबाबदारी स्वीकारण्यास जिल्हा परिषद तयारी दाखवित नाही. त्यामुळे काही कारखान्यांवर शाळा सुरू, तर काही कारखान्यांवर बंद अशी अवस्था सध्या साखरशाळांची आहे. ऊसतोडणी कामगारांना आपले बिऱ्हाड पाठीवर घेऊन ते कामासाठी येतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो. मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडून आपल्या आई-वडिसांसोबत यावे लागते. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही शिकता येत नाही. ही आता ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शोकांतिका बनली आहे.शौचालयांचा अभाव...ज्या वेळी ऊसतोडणी कामगार राहायला येतात, त्या वेळी त्यांना मूलभूत सुविधांसाठी झगडावेच लागते. प्रातर्विधीसाठी शौचालयांची सुविधाच नसल्याने महिलांना उघड्यावर जावे लागते. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते. त्यामुळे याचा परिसरातील आरोग्याची मोठी समस्या निर्माण होते.४शिवाय ऊसतोडणी कामगारांच्या राहण्यासाठी कुठलीही चांगली सोय नाही, त्यांचे तांडे दाखल झाले, की त्यांना झोपड्या बांधून राहावे लागते. कुडकुडत्या थंडीची पर्वा न करता हे कामगार भल्या पहाटे ऊस तोडणीसाठी जातात. त्यांना काही खाण्यापिण्याची पर्वा न करता ही कामे करावी लागतात. ४ऊसतोडणी कामगारांना सर्व सोयीसुविधा मिळतात की नाही, त्यांच्या आरोग्याबाबात, त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत संबंधित ठेकेदार अथवा कारखान्यांनी काही तशी सोय केली आहे की नाही? या गोष्टींची शहानिशा होणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगारांना सुविधा मिळणे, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळणे गरजेचे आहे.४साधारणत: दिवाळीनंतर ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर दाखल होतात. कायद्यानुसार ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवर सोपविली; मात्र या शाळांकडून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतेच नियोजन करण्यात आले नाही. ४ऊसतोडणी कामागरांच्या मुलांच्या हक्काच्या शिक्षणासाठी प्रगत शिक्षण संस्था धावून आली आहे. जिल्ह्यातील १५ ते १६ साखर कारखान्यांवरील ऊसतोडणी कामगारांची हजारो मुले शाळेतच जात नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली होती. आई-वडिलांसमवेत उसाच्या फडातच रमताना ती दिसत होती. ४ऊसतोडणी कामागरांच्या मुलांना रोज त्यांच्या घरी जाऊन नजीकच्या प्राथमिक शाळेत नेऊन बसविण्याची जबाबदारी हे शिक्षक पार पाडत आहेत. या संस्थेने नुकतेच सोमेश्वर कारखान्यावर काम चालू केले असून, आतापर्यंत ४० ते ५० ऊसतोडणी कामागारांची मुले नियमितपणे शाळेत जाऊन शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत आहेत.४ एप्रिल २०१०पासून नवीन शिक्षण हक्क कायद्यानुसार साखर कारखान्यांच्या व जनार्थ या संस्थेच्या साखरशाळा शासनाने बंद केल्या आणि ही जबाबदारी स्वत:वर घेतली होती. ४ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही शासनाची जबाबदारी असतानाही सहा वर्षांपासून ही जबाबदारी पेलण्यात शासन अपयशी ठरले आहे.