शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 04:23 IST

संमिश्र प्रतिक्रिया; दहावीचे महत्त्व कमी होईल

पुणे : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल घटल्याचे खापर भाषा व सामाजिक शास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षेचे (तोंडी) गुण रद्द केल्याच्या निर्णयावर फोडले गेले. तसेच निकाल घटल्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. मात्र, अकरावीतील प्रवेशासाठी पुढील काळात प्रवेश पूर्वपरीक्षेच्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. परंतु, काही शिक्षणतज्ज्ञांनी प्रवेश प्रक्रियेस विरोध केला आहे.दहावीच्या निकालात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १२.३० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी व पालकांकडून अकरावी प्रवेशाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे गुणवगळून त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. परंतु, या विद्यार्थ्यांनी वर्षभर परिश्रम घेऊन तोंडी परीक्षेचे गुण मिळवले आहेत.शासनाने अचानकपणे या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण वजा करून त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका पुण्यातील सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या पालकांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीरझाला आहे.प्रवेश पूर्व परीक्षेच्या पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचे महत्त्व कमी होईल. परंतु,या वर्षी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे उचित होणार नाही. सर्व भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी लागते. ही बाब खर्चिक ठरेल.- अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञशिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एक समान लेखले पाहिजे. सीबीएसई, आयसीएसई किंवा एसएससी बोर्डाचे विद्यार्थी यांच्यात कोणताही भेदभाव कारणे उचित ठरणार नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये.- राजेंद्र सिंग, सचिव,इंडिपेंडेंन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन