शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

अकरावीसाठी प्रवेश पूर्व परीक्षेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 04:23 IST

संमिश्र प्रतिक्रिया; दहावीचे महत्त्व कमी होईल

पुणे : राज्य मंडळाचा दहावीचा निकाल घटल्याचे खापर भाषा व सामाजिक शास्त्र विषयाचे अंतर्गत परीक्षेचे (तोंडी) गुण रद्द केल्याच्या निर्णयावर फोडले गेले. तसेच निकाल घटल्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशावर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. मात्र, अकरावीतील प्रवेशासाठी पुढील काळात प्रवेश पूर्वपरीक्षेच्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही, अशा प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. परंतु, काही शिक्षणतज्ज्ञांनी प्रवेश प्रक्रियेस विरोध केला आहे.दहावीच्या निकालात गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल १२.३० टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी व पालकांकडून अकरावी प्रवेशाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षांचे गुणवगळून त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. परंतु, या विद्यार्थ्यांनी वर्षभर परिश्रम घेऊन तोंडी परीक्षेचे गुण मिळवले आहेत.शासनाने अचानकपणे या विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेचे गुण वजा करून त्यांना अकरावीत प्रवेश देण्याचा चुकीचा निर्णय घेऊ नये, अशी भूमिका पुण्यातील सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या पालकांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा प्रश्न गंभीरझाला आहे.प्रवेश पूर्व परीक्षेच्या पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे दहावीच्या परीक्षेचे महत्त्व कमी होईल. परंतु,या वर्षी प्रवेश पूर्व परीक्षा घेणे उचित होणार नाही. सर्व भाषांमध्ये प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी लागते. ही बाब खर्चिक ठरेल.- अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञशिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना एक समान लेखले पाहिजे. सीबीएसई, आयसीएसई किंवा एसएससी बोर्डाचे विद्यार्थी यांच्यात कोणताही भेदभाव कारणे उचित ठरणार नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये.- राजेंद्र सिंग, सचिव,इंडिपेंडेंन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन