शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय मोर्चा

By admin | Updated: March 26, 2017 02:32 IST

महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा विजय हा मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच झाला आहे, असा

पुणे : महापालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीचा विजय हा मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळेच झाला आहे, असा आरोप करीत विविध पक्षांमधील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्राच्या विरोधात शनिवारी मोर्चा काढला. यापुढील प्रत्येक निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घेतले जावे, अशी मागणीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. महापालिका निवडणुकीतील भाजपा वगळता विविध पक्षांचे पराभूत उमेदवार मोर्चात सहभागी झाले होते. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, अभय छाजेड, दत्ता बहिरट, बाळासाहेब बोडके, तेहसीन पूनावाला, रूपाली पाटील, प्रशांत कनोजिया, मयूरी शिंदे, कमल व्यवहारे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्तेही उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले की, भाजपाचा विजय मतदान यंत्रांतील घोटाळ्यामुळेच झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मतदान झाल्यानंतर, मतदाराला त्याने कोणाला मतदान केले आहे याची माहिती देणारी पावती द्यावी, असा आदेश दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून निवडणुका घेण्यात येत आहेत. शनिवारवाड्यापासून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला. तिथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात मतदान यंत्रासंबधी तक्रारी करण्यात आल्या.(प्रतिनिधी)मतदानानंतर पावती मिळावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेतील चर्चेत शुक्रवारी मतदान यंत्रासंबंधींचा विषय उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी शनिवारी पुण्यात विभागीय आयुक्तांना मतदान यंत्राबाबत शंका घेणारे निवेदनही दिले. त्यात त्यांनी मतदान झाल्यानंतर, मतदाराला त्याच्या मतदानाची पावती मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी केली. भारतीय लोकशाही टिकवायची असेल, तर ईव्हीएम मशीनवर मतदान न घेता, बॅलेट पेपरवर घ्यावे. ईव्हीएम मशीनद्वारे दिलेले मत मतदाराला पाहता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने लवकरात लवकर लक्ष द्यावे. पुणे महापालिका निवडणुकीत ४१ प्रभागांत पाहणी केली असता, १५ प्रभागांत निवडणूक जाहीर केलेल्या आकडेवारीत १० टक्के मते कमी असल्याचे दिसते, तर उर्वरित प्रभागात झालेल्या मतदानापेक्षा १० टक्के मते जास्त आढळली आहेत . या गैरप्रकाराची दखल घेऊन निवडणूकआयोगाने पुन्हा निवडणूक आणि ती मतपत्रिकेवर असावी, अशी मागणी करण्यात आली.