शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमार संघटनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:50 IST

उजनी धरण : मासेमारी व्यवसायावर होणार विपरीत परिणाम

भिगवण : उजनी धरणात होणाऱ्या तरंगत्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीने कडाडून विरोध केला आहे. हा प्रकल्प झाला तर मासेमारी करणाºयांच्या जिवावर उदरनिर्वाह करणाºया २५ ते ३० हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन बाजू सरकारच्या समोर मांडण्यास सांगितले.

सरकारने नवीकरणीय ऊर्जा स्रोतापासून वीज निर्मितीचे महत्त्व लक्षात घेत राज्यातील ऊर्जेच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी असे प्रकल्प हाती घेतले असून, यात उजनी धरणातील होणाºया प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात ५ हजार हेक्टर जलक्षेत्रावर १ हजार मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात ५ हजार जलक्षेत्रावर १ हजार अशी एकूण १० जलक्षेत्रावर २ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. याचा फायदा प्रामुख्याने उजनी किनारी असणाºया शेतकºयांना दिवसा वीज मिळण्यात होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष सीताराम नगरे, कोषाध्यक्ष नंदकुमार नगरे, पुणे जिल्हा अध्यक्ष राजू नगरे, बाजार समितीचे सदस्य आबासाहेब देवकाते, राजेंद्र देवकाते यांनी निवेदन देत आपला विरोध दर्शविला.यातून मासेमारी व्यवसायावर परिणाम होणार असून, तीस हजार मासेमारी करणारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे स्थानिक मासेमारांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. यासाठी गेल्या महिन्यात जलसमाधी आंदोलन करीत प्रकल्प झाला तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे जाहीर केले. याबाबत इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत आपले म्हणणे सरकार दरबारी पोहोचवून प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. 

टॅग्स :Puneपुणे