शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

विमानतळाला शेतक-यांचा विरोधच , विजय शिवतारेंनी उतावीळ होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:49 IST

पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत.

सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत. यामुळे शेतक-यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. विमानतळविरोधी जनसंघर्ष समितीच्या वतीने याचा पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.या वेळी जि. प. सदस्य व जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांसह समितीचे सदस्य आणि बाधित गावांचे सरपंच उपस्थित होते.आमदार विजय शिवतारे हे आपल्या भागामध्ये विकासकामे करण्याऐवजी विमानतळासाठी उतावीळ झाल्याचे दिसून येत आहेत. जमिनीचे मालक शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे आहे. त्यांनी आंदोलने, मोर्चे काढून आपला तीव्र विरोध नोंदविला, असे झुरूंगे यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी विमानतळविरोधी जन संघर्ष समितीचे उपाध्यक्ष व कुंभारवळणाचे सरपंच अमोल कामथे, सहसचिव लक्ष्मण बोरावके तसेच मेमाणे-पारगावचे सरपंच बापू मेमाणे, एखतपूर-मुंजवडीच्या सरपंच लक्ष्मी काळुराम धिवार, उदाचीवाडीच्या सरपंच सुनंदा चंद्रकांत झेंडे, वनपुरीच्या सरपंच विद्या दत्तात्रय महामुनी यांसह जनसंघर्ष समितीचे सदस्य महादेव टिळेकर, जितेंद्र मेमाणे, विठ्ठल मेमाणे, रामदास होले, महादेव कुंभारकर, रामदास कुंभारकर, निवृत्ती कामथे, सतीश कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर आदी उपस्थित होते.जमिनी शेतकºयांच्या असून त्यांनी यापूर्वीही वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करून विरोध केला आहे. एक इंचही जमीन देणार नसल्याचे ठरविले आहे, असे असताना पुरंदरमध्येच विमानतळ होणार, असे बोलणारे शिवतारे कोण? असा सवाल या वेळी झुरंगे यांनी केला. शेतकरी विमानतळासाठी जमिनी देण्यास तयार नाहीत. यापूर्वी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी मेमाणे-पारगाव येथे झालेल्या बैठकीत शिवतारे यांनी विमानतळाबाबत मी शेतकºयांच्या निर्णयाबरोबर आहे, शेतकºयांना विमानतळ नको असेल तर मी होऊ देणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र त्यानंतर शिवतारे या भागात फिरकलेही नाहीत.