शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

जेजुरी घाटरस्त्याला विरोध, गडाच्या अस्तित्वाला पोहोचू शक तो धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:53 IST

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या श्री मार्तंड देवसंस्थानने गडावरील घाटरस्त्याच्या कामासाठी जाहीर निविदा मागविल्यामुळे जेजुरीकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांची तातडीची बैठक घेण्यात आली.

जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या श्री मार्तंड देवसंस्थानने गडावरील घाटरस्त्याच्या कामासाठी जाहीर निविदा मागविल्यामुळे जेजुरीकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांची तातडीची बैठक घेण्यात आली.मंदिर गडकोट परिसर वाचविण्यासाठी नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मात्र, विश्वस्त मंडळाने गडावर रस्ता करण्याचा निर्णय घेतल्याने गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जेजुरगड मंदिर आणि गड परिसर वाचविण्यासाठी लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी या बैठकीत केला.या रस्त्याला विरोध करण्यसाठी माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी विश्वस्त सुनील असवलीकर, संजय इनामके, गणेश टाक, जेजुरी शहर नागरिक हक्क कृती समिती अध्यक्ष राहुल मांगवाणी, भाजप शहराध्यक्ष अशोक खोमणे, बापू वीरकर, अविनाश झगडे, संदीप केंजळे, छबन कुदळे, प्रसाद अत्रे, अतुल सावंत व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.२००१ मध्ये हा रस्ता करण्याचा प्रथम प्रयत्न करण्यात आला होता. जेजुरीकर ग्रामस्थांचा विरोध, संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरणवादी संस्था व पुरातत्त्व विभागामुळे या रस्त्याचे काम बंद करण्यात आले होते.जेजुरगड टेकडीवर असून मुरुमाड दगड व गेरूस्तर असलेली ही टेकडी आहे. मागील रस्त्याच्या प्रयत्नांतून हे स्तर उघडे पडले असून, टेकडीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. या टेकडीवर असलेल्या मंदिराच्या गडकोटास पाया नसून कोटाच्या तळातील दगड ठिसूळ झाल्याने सभोवती सिमेंट काँक्रीटचे संरक्षण उभे करून आधार देण्यात आला आहे.सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या गडाचे काम झाले असून, तीनशे वर्षांपूर्वी गडाचे पुनर्निर्माण झालेले आहे. रस्त्याचे बांधकाम व रस्त्यामुळे मानवी हस्तक्षेप वाढल्याने टेकडीस इजा पोहोचू शकते व गडाचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते.श्री मार्तंड देवसंस्थानने रस्ता निर्माण करण्यासाठी आपत्कालीन रस्ता असे गोंडस नावाखाली घाटरस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे.मार्च २०१८ मध्ये विश्वस्त मंडळाने कुठलाही ठराव न करता तसेच जेजुरीकरांना विश्वासात न घेता घाटरस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केले.त्यासाठी गडाच्या टेकडीवर विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन केले. याविरोधात हेमंत सोनवणे यांनी तक्रार केली होती. दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागाकडून श्रीमार्तंड देवसंस्थान यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते की जेजुरगड मंदिर व परिसर पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून अधिसूचित केले असून, येथे या परिसरामध्ये कुठलेही बदल करण्यापूर्वी पुरातत्त्व खात्याला कळविणे बंधनकारक आहे आणि ना हरकत असल्याशिवाय कुठलेही काम करू नये.असे असतानाही हे काम होत आहे. मंदिर गडकोट परिसर वाचविण्यासाठी जेजुरीकर नागरिकांनी आत्तापर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जेजुरगड मंदिर आणि परिसर वाचविण्यासाठी जेजुरीकर नागरिकांचा लढा देण्याचा निर्धार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी दि. १५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.जेजुरी श्रीमार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी जेजुरीगडावर आपत्कालीन रस्ता करण्याचे निर्देश धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्यानुसार रस्त्याचे टेंडर काढण्यात आले आहे. या रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध असेल तर ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढू. शहराच्या हितासाठीचा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या