शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:09 IST

जागतिक पातळीवर दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत: अमेरिकेत या विषयाला अधिक महत्त्व दिले गेले. त्याची परिणिती म्हणजे आता अमेरिकेत विविध नावाजलेले ...

जागतिक पातळीवर दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत: अमेरिकेत या विषयाला अधिक महत्त्व दिले गेले. त्याची परिणिती म्हणजे आता अमेरिकेत विविध नावाजलेले थिंक टॅंक, संस्था व सामरिक विषयांवर कार्यरत आहेत. त्याचाच परिणाम आपणास भारतातही पहावयास मिळतो. आज भारतात एमपी, आयडीएसए मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा नवी दिल्ली, ओआरएफ ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन (डी.पी.जी.) दिल्ली पाॅलिसी ग्रुप, नवी दिल्ली, सीपीसीआर सेंटर फाॅर स्ट्रेटजिक स्टडीज, सेंटर फाॅर फॅसिटी रिसर्च, नॅशनल डिफेन्स काॅलेज नवी दिल्ली, एनआयएएस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्समधील व इतर संस्था राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून भारतात राष्ट्रीय सुटकेबाबत सर्वदूर चर्चा होऊन शांतता कालखंडात व युद्ध कालखंडात संघर्ष निवारण आणि त्याचे व्यवस्थापन याबाबत ध्येयधोरणे आखली जातात. त्यामुळे जे विद्यार्थी एम.ए./एम.एस्सी. संस्था आणि सामाजिक शास्त्र विषयात पारंगत होतात. ते पुढे या राष्ट्रीय संस्थेत संशोधक धोरण ठरविणारे अधिकारी म्हणून कार्यरत होऊ शकतात. तसेच विविध राष्ट्रीय आणि आंंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियामध्ये या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते.

अभ्यासक्रम कोणते?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १९६२ च्या युद्धानंतर हा विषय शिकवण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला लष्करी इतिहास, नंतर ‘संरक्षणशास्त्र’ व आता संस्था आणि सामारिकशास्त्र या विषयात एम. एस./एम.एसी. पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जात आहे. तसेच २०१७ पासून विद्यापीठाने अभ्यासक्रमात बदल केले. आता विभागात प्रथमच इयत्ता बारावीनंतर पाच वर्षांचा एकत्रित एम. एस./एम.एससी. हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अशा पद्धतीचा संरक्षण आणि सामरिकशास्त्रातील भारतातील हा पहिलाच अभ्यासक्रम आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींना बरावीनंतर लष्करात जाण्याची संधी मिळाली नाही. त्यांना बीए/बी.एसी. करून (सीडीएस) Combined Defence Service च्या परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून तयारी करण्यात येते. तसेच ज्यांना पुढे थिंक टॅंकमध्ये संशोधक व्हायचे आहे. ते पुढे एम. एम./एम. एससी करू शकतात. भारत सरकारने नवीन मेक इन इंडिया व आत्मनिर्भर धोरणांची अंमलबजावणी केली आहे. त्याद्वारे खासगी क्षेत्रात विविध तंत्रज्ञानाची माहिती असणाऱ्या युवकांची गरज भासणार आहे. त्यामुळे डीआरडीओच्या संदर्भातील (Defence Tectrories ) संरक्षण तंत्रज्ञान या विषयावरचा नवीन अभ्यासक्रम विभागाने तयार केला आहे. तसेच भारतीय समुद्रातील विविध खनिजे, नैसर्गिक स्त्रोत व त्यांचे सामरिक महत्त्व या विषयावरही विभागात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाचा करिअरसाठी चांगलाच फायदा होणार आहे.

विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे राष्ट्रबांधणीसाठीचे महत्त्व असा एक नावीन्यपूर्ण एक वर्षाचा पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार केला केलेला आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रीय सुरक्षा’, प्रतिदहशतवादाचे धोरण, सायबर सुरक्षा व राष्ट्रीय सुरक्षा दक्षिण व पश्चिम आशिया व सुरक्षा, रासायनिक, शांतता आणि सुरक्षा, युरोपियन शांतता आणि सुरक्षा अशी नऊ वेगवेगळे पी. जी. डिप्लोमा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. संरक्षण आणि सामाजिक शास्त्रात सर्व पैलूंचा अभ्यास पुणे विद्यापीठात केला जात आहे. त्यातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातही प्रामुख्याने जे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करतात त्यांना जनरल स्टडीज व आंतरराष्ट्रीय संबंध या दोन पेपरचा अभ्यास विद्यापीठातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सोपा जाऊ शकतो.

- डाॅ. विजय खरे, विभागप्रमुख, संरक्षण व सामरिकशास्त्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ