शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

एकाच पुलाचे दोनदा उद्घाटन

By admin | Updated: May 29, 2017 02:56 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. सांगवी फाटा येथे बांधलेल्या जोतिबा फुले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. सांगवी फाटा येथे बांधलेल्या जोतिबा फुले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न टाकल्यामुळे राष्ट्रवादीने शनिवारी उद्घाटन केले. तर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मधील सांगवी फाटा येथील महात्मा जोतिबा फुले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर तयार केला आहे. निवडणुकीपूर्वी तयार झालेला पूल गेली तीन महिने सुरू केला नव्हता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी आवाज उठविला होता. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे भाजपाने या पुलाचे उद्घाटन लांबणीवर टाकले होते. पुलाबाबत नागरिकांकडून मागणी होत असल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्याचे नियोजन केले. मात्र, पत्रिकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले नाही. पंरतु, भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची नावे टाकली. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शनिवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. याबाबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर रविवारी राष्ट्रवादीने उद्घाटन केलेल्या पुलाचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मानापमान रंगले.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. याबाबत ठाकरेंचे तैलचित्र लावताना शिवसेनेला बाजूला ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांनाही फारशे स्थान दिले नाही. व्यासपीठावर संघ आणि भाजपाचेच नेते अधिक होते. प्रोटोकॉलनुसार खुर्च्या मांडलेल्या नव्हत्या. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे मत व्यक्त करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव कापण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांचे भाषण होण्यापूर्वी बारणे यांनी माईक हातात घेऊन मनोगत व्यक्त केले. ही बाब लक्षात येताच तावडे आणि बापट यांनी स्थानिक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे कान टोचले. राजकारणात मतभेद असावेत मनोभेद असू नयेत. राजकीय अस्पृशता असू नये, असे कान टोचले.