शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचे तीन ते साडेचार टक्केच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:20 IST

प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : कोरोना होऊन गेल्यावर रुग्णाच्या शरीरात आयजीजी नावाच्या अँटिबॉडी तयार होतात आणि त्या तीन महिने ते ...

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : कोरोना होऊन गेल्यावर रुग्णाच्या शरीरात आयजीजी नावाच्या अँटिबॉडी तयार होतात आणि त्या तीन महिने ते एक वर्षापर्यंत टिकू शकतात. याशिवाय, ई-सेल, टी-सेल्स आणि मेमरी सेल्सही महत्त्वाची भूमिका बजावतात. अँटिबॉडीच्या पातळीवर संरक्षणाचे प्रमाण ठरते. जगभरातील अभ्यासानुसार कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तीन ते साडेचार टक्के इतके आहे.

शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ही आकडेवारी दिलासादायक ठरत आहे. मात्र, कोरोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत प्लाझ्मादान करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसत नाही. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये अँटिबॉडी तयार होत असल्याने त्यांनी २८ दिवसांनी प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

----

लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये कमी अँटिबॉडी तयार होतात आणि गंभीर रुग्णांमध्ये जास्त अँटिबॉडी तयार होतात, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांच्या तुलनेत जास्त अँटिबॉडी तयार होऊ शकतात. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये अँटिबॉडी साधारण सहा महिने टिकत असल्याने पुन्हा संसर्ग होण्याची शक्‍यता ९५ टक्‍क्‍यांनी कमी होते. शरीरात विषाणू नसतात, तेव्हा अँटिबॉडी ऍक्टिव्ह नसतात. शरीरातील ई-सेलवरही प्रोटेकटिव्ह रिस्पॉन्स अवलंबून असतो. आपल्या शरीरात अँटिबॉडीची पातळी किती आहे, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. साडेचारपेक्षा कमी रेंज असेल तर अँटिबॉडीचे प्रमाण कमी, साडेचार ते साडेअठरा दरम्यान रेंज असल्यास मध्यम स्वरूपाच्या आणि साडेअठरापेक्षा जास्त असल्यास जास्त प्रमाणात अँटिबॉडी आहेत, असे मानले जाते.

- डॉ अमित द्रविड, संसर्गजन्यरोगतज्ज्ञ, नोबेल हॉस्पिटल

------

कोरोनामुक्त रुग्णांमध्ये तयार झालेल्या अँटिबॉडी तीन ते चार महिने टिकतात. त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते. प्रत्येक व्यक्तीचे शरीर विषाणूला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असते. अँटिबॉडी मोजणे हा इम्युनिटीचा एक प्रकार आहे. याशिवाय शरीरात तयार झालेले ई-सेल, टी-सेल हेही महत्त्वाची भूमिका बजावतात. कोरोना झाल्यानंतर शरीरात मेमरी सेल निर्माण होतात. कोरोना होऊन गेल्यावर ते ऍक्टिव्हेट होतात. पुन्हा या प्रकारचा विषाणू शरीरात शिरल्यास त्या त्वरित विषाणूला ओळखतात आणि त्यामुळे आजार गंभीर होत नाही. जगभरातील अभ्यासानुसार पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तीन ते साडेचार टक्के इतकेच आहे.

- डॉ. प्रदीप आवटे, राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी

------

कोरोनामुक्त रुग्णांना लसीचा एक डोस पुरेसा?

सायन्स इम्युनोलॉजिकलमध्ये प्रकाशित झालेल्या पेन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीच्या संशोधनात ज्यांना कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना कोरोनाचा कोणत्याही लसींचा एक डोस पुरेसा आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अमेरिकेत झालेल्या संशोधनामध्ये कोरोनामुक्त रुग्णांमधील अँटिबॉडीची पातळी तपासण्यात आली. सामान्य नागरिकांना लसीचे दोन डोस दिल्यानंतर जितक्या अँटिबॉडी तयार होतात, त्याच्या दहापट अँटिबॉडी कोरोनामुक्त रुग्णांना एक डोस दिल्यावर तयार झाल्याचे लक्षात आले. मात्र, एका संशोधनाच्या निष्कर्षावरून भारतातील लसीकरण कार्यक्रमांमध्ये बदल करणे शक्य नाही. शिवाय दुसरा डोस घेतल्यानंतर शरीराला तोटा काहीच होत नाही, असे डॉ. द्रविड यांनी सांगितले.

डॉ. आवटे म्हणाले, सध्या जगभरात कोरोनाशी संबंधित वेगवेगळे संशोधने आणि अभ्यास प्रसिद्ध होत आहेत. कोरोना विषाणूशी आपली झालेली ओळख केवळ एक वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे विविध प्रकारे अभ्यास आणि संशोधने करणे आवश्यक आहे. मात्र एखादे संशोधन प्रसिद्ध झाल्यानंतर त्या क्षेत्रातील इतर तज्ज्ञ लोकांचा अभिप्रायही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे एखादे संशोधन झाले की लगेच धोरणात्मक निर्णयात बदल होतात, असे नाही, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.