शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सामर्थ्य केवळ विद्यार्थ्यांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून भारताला वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी. कारण भारताला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून भारताला वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी. कारण भारताला वैज्ञानिकदृष्ट्या सक्षम करण्याचे सामर्थ्य केवळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी समाजाच्या विविध समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहून सहज व सुलभ उपाय शोधावेत जेणेकरून भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे उद्दिष्ट साध्य करेल, असे प्रतिपादन मुंबई येथील केंद्रीय अणुऊर्जा खात्याच्या संशोधन व विकास विभागाच्या संयुक्त सचिव सुषमा ताईशेटे यांनी केले.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जीएमआरटीने आयोजित केलेल्या ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सुषमा ताईशेटे यांचे हस्ते झाले. या वेळी एनसीआरएचे अधिष्ठाता प्रा. यशवंत गुप्ता उपस्थित होते.

देशभरातील ९ राज्यांमधील ३२९ शाळेतल्या एकूण ८५० विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन प्रदर्शनात सहभाग घेतला.एकूण ६४७ ऑनलाईन विविध प्रयोग व प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. एनसीआरएचे वरिष्ठ अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी प्रास्ताविक केले. हे प्रदर्शन यापुढे १५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

......

प्रदर्शनाचे हे ठरले आकर्षण

ऑनलाईन प्रदर्शनात नाचणारा रोबो, जलसंवर्धन, सूर्यमाला, पवनचक्की, घरगुती सॅनिटायझर, केळीच्या पानापासून पेपर तयार करणे, वजन उचलणारे क्रेन, कचरा व्यवस्थापन प्रकल्प,पूर परिस्थिती नियंत्रण प्रणाली, अवकाश प्रवास, समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मिती, सौरऊर्जा : उद्याच्या काळाची गरज, भूकंप सूचक यंत्र,कोरोना मानवी पेशींवर कसा परीणाम करतो,ठिबक सिंचन, स्वयंचलित डोअरबेल, वॉटर फिल्टर, आदी विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सादर केले.

---

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. कोरोनाच्या निमित्ताने हे विज्ञान प्रदर्शन देशभर पोचले आहे आणि देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकले याचा विशेष आनंद आहे.

- डॉ. जे. के. सोळंकी, वरिष्ठ अधिकारी, एनसीआरए, पुणे