शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाणी हाच आत्मा : राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:34 IST

आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले.

खोर : आगामी काळातील दौंड तालुक्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने करायची असेल, तर खडकवासला, मुळशी धरणाच्या पाण्याच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन पाहिजे. पाणी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, ते दौंडला कशा प्रकारे आणता येईल याबाबत विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले.

खोर (ता. दौंड) हरिबाचीवाडी येथील पद्मावती तलावात आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून जनाई-शिरसाईच्या टंचाई योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे जलपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल म्हणाले, की यावर्षी पुण्यासारख्या शहराला पाणीकपात करावी लागली आहे.

आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले. आपण आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकलो नाही याची मला खंत आहे. पूर्वी शासनाकडे मागणी केली होती, की पावसाळ्यातील पाणी आम्हाला मोफत द्या, आणिडिसेंबर-जानेवारीत जे पाणी घेऊ त्याचे आम्ही पैसे भरू. परंतु, आता शासनाने हे सर्व माफ करून केवळ १९ टक्केच रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. उर्वरित ८१ टक्के रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे येथून पुढे जून-जुलैमध्ये पावसाळ्यातच मागणी केली तरच या भागामधील सर्व बंधारे हे भरले जाऊन याचा फायदा पुढील काळात होणार आहे.दौंड शहराला खडकवासला, मुळशी धरणांच्या पाण्याच्या संदर्भात बैठका चालू असून, पाण्याचे नियोजन चालू आहे. ’ सरपंच सुभाष चौधरी, डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, राजेंद्र डोंबे, विजय कुदळे, सुहास चौधरी, राहुल चौधरी, पांडुरंग डोंबे, भानुदास डोंबे, विकास चौधरी, नामदेव चौधरी, बाळासाहेब चौधरी, जालिंदर डोंबे, हनुमंत चौधरी, नाना चौधरी आदी उपस्थित होते.जि. प. व पं. स. सदस्यांनादेखील कामे सांगातुम्ही तुमच्या भागामधील जो जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून दिला आहे, त्या सदस्यालादेखील तुम्हाला विकासकामे मागण्याचा हक्क आहे. त्यालादेखील तुम्ही किती निधी आतापर्यंत खोरमध्ये आणला आहे हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, असेही कुल यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे