शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाणी हाच आत्मा : राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:34 IST

आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले.

खोर : आगामी काळातील दौंड तालुक्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने करायची असेल, तर खडकवासला, मुळशी धरणाच्या पाण्याच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन पाहिजे. पाणी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, ते दौंडला कशा प्रकारे आणता येईल याबाबत विचार केला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले.

खोर (ता. दौंड) हरिबाचीवाडी येथील पद्मावती तलावात आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून जनाई-शिरसाईच्या टंचाई योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचे जलपूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. आमदार राहुल कुल म्हणाले, की यावर्षी पुण्यासारख्या शहराला पाणीकपात करावी लागली आहे.

आपणालादेखील याबाबत काही नियोजन करावे लागले. आपण आणखी चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकलो नाही याची मला खंत आहे. पूर्वी शासनाकडे मागणी केली होती, की पावसाळ्यातील पाणी आम्हाला मोफत द्या, आणिडिसेंबर-जानेवारीत जे पाणी घेऊ त्याचे आम्ही पैसे भरू. परंतु, आता शासनाने हे सर्व माफ करून केवळ १९ टक्केच रक्कम शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. उर्वरित ८१ टक्के रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे येथून पुढे जून-जुलैमध्ये पावसाळ्यातच मागणी केली तरच या भागामधील सर्व बंधारे हे भरले जाऊन याचा फायदा पुढील काळात होणार आहे.दौंड शहराला खडकवासला, मुळशी धरणांच्या पाण्याच्या संदर्भात बैठका चालू असून, पाण्याचे नियोजन चालू आहे. ’ सरपंच सुभाष चौधरी, डी. डी. बारवकर, दिलीप डोंबे, राजेंद्र डोंबे, विजय कुदळे, सुहास चौधरी, राहुल चौधरी, पांडुरंग डोंबे, भानुदास डोंबे, विकास चौधरी, नामदेव चौधरी, बाळासाहेब चौधरी, जालिंदर डोंबे, हनुमंत चौधरी, नाना चौधरी आदी उपस्थित होते.जि. प. व पं. स. सदस्यांनादेखील कामे सांगातुम्ही तुमच्या भागामधील जो जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून दिला आहे, त्या सदस्यालादेखील तुम्हाला विकासकामे मागण्याचा हक्क आहे. त्यालादेखील तुम्ही किती निधी आतापर्यंत खोरमध्ये आणला आहे हे विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, असेही कुल यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे