शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार महिलांमागे फक्त एकच स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 03:33 IST

राष्ट्रीय निकष : ४० ते ५० व्यक्तींमागे एक शौचालय असावे

- माऊली शिंदेकल्याणीनगर : नगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय अतंर्गत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, म.हौ. बोर्ड, कल्याणीनगर, लोहगाव या भागातील जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त महिलांची लोखसंख्या आहे. या महिलांसाठी फक्त सातच स्वच्छतागृहे क्षेत्रीय कार्यालयाने बांधली आहेत. जवळपास वीस हजार महिलांमागे एक स्वच्छतागृह आहे. स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे.महिलांसांठी स्वच्छतागृहांच्या बाबतीत धोरण आखावे अशी सूचना उच्च न्यायालयाने केली होती. गर्दीच्या ठिकाणी शंभर महिलांमागे एक स्वच्छतागृह असावे. तसेच ४० ते ५० व्यक्तींमागे एक शौचालय असावे असा राष्ट्रीय निकष आहे. मात्र, पालिकेने उच्च न्यायालयाची सूचना आणि स्वच्छतागृहा बाबत असलेले राष्ट्रीय निकष या दोन्ही गोष्टी कडे दुलर्क्ष केले आहे. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाअतंर्गत वडगावशेरी, चंदननगर, खराडी, विमाननगर, गांधीनगर, कल्याणीनगर, संजय पार्क आणि लोहगाव हा परिसर येतो. या परिसाची लोखसंख्या जवळपास साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे. या भागातील महिलांची लोकसंख्या दीड लाखापेक्षा जास्त आहे. तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आयटी पार्क, कॉल सेंटर, शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि खासगी कार्यालय आहे. या ठिकाणी कामासाठी अनेक महिला येतात. या कामाला येणाऱ्या महिला सार्वजनिक आणि खासगी वाहनाचा वापर करतात. या महिलांसाठी या भागात स्वच्छतागृह नाही. जी स्वच्छतागृह आहेत ती वर्दळीपासून दूर आहेत. स्वच्छतागृहामध्ये पाणी नसणे, अस्वच्छता आदी समस्या आहेत.सहा. आयुक्तांना महिलांच्या समस्यांचे गांभीर्य नाहीनगर रोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाने आतापर्यंत महिला स्वच्छतागृहासाठी किती निधी खर्च केला. महिला स्वच्छतागृह का बांधले जात नाही आदी प्रश्नाच्या उत्तरांसाठी नगररोड-वडगावशेरी क्षेत्रीय कार्यलयाचे सहा. आयुक्त राजेश बनकर यांना फोन केला होती. मात्र, त्यांनी फोन घेऊन लगेच बंद केला. क्षेत्रीय कार्यालयांर्तगत कोणतीही माहिती सहा. आयुक्तांना विचारल्यावर, मी नवीन आहे असेच ते सांगतात. सहा. आयुक्त नागरिकांचे फोन घेत नाहीत. फक्त राजकीय प्रतिनिधींचा फोन घेतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.स्वच्छतागृह नसल्याने महिलांच्या आरोग्यावर परिणाममहिला स्वच्छतागृह नसल्याने लघवीला जास्त जावे लागू नये म्हणून अनेक महिला कमी पाणी पितात. लघवी रोखून धरतात. सतत लघवी रोखून धरल्याने स्नायूंवर आणि किडनीवर ताण पडतो. बृद्धकोष्ठ, मुतखडा, रक्ताभिसरण आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अस्वच्छ स्वच्छतागृहाचा वापर केल्यामुळे जंतुसंसर्ग होतो.