शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

...तरच लोकशाही सुदृढ होईल

By admin | Updated: June 30, 2017 04:06 IST

देशाच्या १३१ कोटी लोकसंख्येपैकी केवळ १० कोटी लोक सरकार चालवतात. लोकशाहीला स्थैर्य द्यायचे असेल तर वैविध्य येणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या १३१ कोटी लोकसंख्येपैकी केवळ १० कोटी लोक सरकार चालवतात. लोकशाहीला स्थैर्य द्यायचे असेल तर वैविध्य येणे गरजेचे आहे. घटनेत केवळ २२ भाषांना मान्यता असून, उर्वरित ९६ टक्के भाषा संसदेत प्रतिबिंबित होत नाहीत. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी निष्पक्ष, निरपेक्ष, सर्वसमावेशक, विचारवादी घटक तयार झाले पाहिजेत. देशात राजकीय सत्तास्थानासाठी मोठी रांग लागली आहे. सत्ता संसदेच्या बाहेर प्रस्थापित झाल्यास, लोकांचे अधिकार जपणारी सत्तास्थळे निर्माण झाल्यास लोकशाही सुदृढ होईल, असा आशावाद ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला.अक्षरमानवतर्फे डॉ. गणेश देवी आणि डॉ. सुरेखा देवी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी देवी दाम्पत्याने ४२ वर्षांच्या सहजीवनाचे गुपित संवादातून उलगडले. एकमेकांमुळे आमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला असून, आम्ही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप न करता बरोबरीने वाटचाल करतो, असे त्यांनी सांगितले. स्वत:चे घर असू नये, अशी आमची दुर्दम्य इच्छा आहे, असेही डॉ. देवी म्हणाले.सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर नेमकेपणाने बोट ठेवत ते म्हणाले, ‘‘भाषांमधील बदलांचा गंभीर परिणाम शिक्षणावर होणार आहे. पुढील १०-१५ वर्षांमध्ये हे स्वरूप ओळखू येणार नाही. सध्या दलित, आदिवासी, मुस्लिमांचे शिक्षणातील प्रमाण भीती वाटावे इतके कमी आहे. शिक्षणाविषयी अर्थपूर्ण विवाद, दूरदृष्टीने विचार होत नाही. आपल्या घोडचुकांचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीत देश पूर्ण अपयशी ठरला आहे. त्यामध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहेत.’’