शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

...तरच लोकशाही सुदृढ होईल

By admin | Updated: June 30, 2017 04:06 IST

देशाच्या १३१ कोटी लोकसंख्येपैकी केवळ १० कोटी लोक सरकार चालवतात. लोकशाहीला स्थैर्य द्यायचे असेल तर वैविध्य येणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : देशाच्या १३१ कोटी लोकसंख्येपैकी केवळ १० कोटी लोक सरकार चालवतात. लोकशाहीला स्थैर्य द्यायचे असेल तर वैविध्य येणे गरजेचे आहे. घटनेत केवळ २२ भाषांना मान्यता असून, उर्वरित ९६ टक्के भाषा संसदेत प्रतिबिंबित होत नाहीत. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी निष्पक्ष, निरपेक्ष, सर्वसमावेशक, विचारवादी घटक तयार झाले पाहिजेत. देशात राजकीय सत्तास्थानासाठी मोठी रांग लागली आहे. सत्ता संसदेच्या बाहेर प्रस्थापित झाल्यास, लोकांचे अधिकार जपणारी सत्तास्थळे निर्माण झाल्यास लोकशाही सुदृढ होईल, असा आशावाद ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केला.अक्षरमानवतर्फे डॉ. गणेश देवी आणि डॉ. सुरेखा देवी यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी देवी दाम्पत्याने ४२ वर्षांच्या सहजीवनाचे गुपित संवादातून उलगडले. एकमेकांमुळे आमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला असून, आम्ही एकमेकांच्या कामात हस्तक्षेप न करता बरोबरीने वाटचाल करतो, असे त्यांनी सांगितले. स्वत:चे घर असू नये, अशी आमची दुर्दम्य इच्छा आहे, असेही डॉ. देवी म्हणाले.सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर नेमकेपणाने बोट ठेवत ते म्हणाले, ‘‘भाषांमधील बदलांचा गंभीर परिणाम शिक्षणावर होणार आहे. पुढील १०-१५ वर्षांमध्ये हे स्वरूप ओळखू येणार नाही. सध्या दलित, आदिवासी, मुस्लिमांचे शिक्षणातील प्रमाण भीती वाटावे इतके कमी आहे. शिक्षणाविषयी अर्थपूर्ण विवाद, दूरदृष्टीने विचार होत नाही. आपल्या घोडचुकांचे परिणाम पुढील पिढ्यांना भोगावे लागणार आहेत. शिक्षणाच्या बाबतीत देश पूर्ण अपयशी ठरला आहे. त्यामध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहेत.’’