शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

हॉटेलममधून कांद्याचे पदार्थ गायब

By admin | Updated: August 24, 2015 02:46 IST

सध्या कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. शुक्रवारपर्यंत कांद्याचा भाव सत्तरीच्या वर गेला होता. त्यामुळे ऐरव्ही दोन ते पाच रुपये प्रतिकिलो जाणारा कांदा आता ७० ते ७५ रुपये

पळसदेव : सध्या कांद्याचे दर गगणाला भिडले आहेत. शुक्रवारपर्यंत कांद्याचा भाव सत्तरीच्या वर गेला होता. त्यामुळे ऐरव्ही दोन ते पाच रुपये प्रतिकिलो जाणारा कांदा आता ७० ते ७५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आसू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एरव्ही हॉटेल, ढाबे या ठिकाणी जेवण्यासाठी गेल्यास कांदा हमखास दिला जात होता. मात्र, कांद्याच्या वाढत्या दरामुळे हॉटेलचालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कांद्याऐवजी काकडी किंवा मुळा दिला जात आहे. कांदा हे पीक कमी दिवसात शेतकऱ्यांना आर्थिक प्राप्ती मिळवून देणारे पीक ओळखले जाते. परंतु, मागील ५ ते ७ वर्षाचा विचार केल्यास कांद्याला १० ते १५ रुपयांच्या पुढे दर मिळालेला नाही. त्यामुळे कांदा पिकाला हमीभाव देण्याची मागणी शेतकरी वेळोवेळी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी कांद्याला योग्य बाजारभाव नसल्यास पाचटाची आडी करून किंवा पत्र्याचे शेड उभारून कांद्याची साठवणूक करीत असत. मात्र, कांदा हा नाशवंत पीक असल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यातच अवेळी पडणारा पाऊस, गारपीट, ढगाळ वातावरण यामुळे यावर्षी कांद्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी, असे गणित निर्माण झाल्याने कांद्याच्या दराने उसळी मारली आहे. एरव्ही अल्प बाजारभावात जाणारा कांदा आता मात्र ‘भाव’ खाऊ लागला आहे. दररोज कांद्याचे दर वाढतच असल्याने ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा आहे. ते शेतकरी खूष झाले आहेत. जणू काही आपल्याला लॉटरीच लागली असल्याच्या बोलकथा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या तोंडून उमटत आहेत. शुक्रवारी कांद्याला दर प्रतिक्विंटल ७४०० पर्यंत गेल्याने आणखी कांद्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढताना दिसत आहेत. सोलापूर, पुणे, मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी कांदा नेला जात आहे. दरम्यान कांद्याचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू तर सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात आसू येत आहे. कांदा हा दैनंदिन जीवनात वापरला जातो. मात्र, कांद्याच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने कांदा विकत घेणे अवघड बनले आहे. (वार्ताहर)