शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कांद्याचे दर आणखी वाढणार; आवक ६० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने सध्या राज्यातील सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक तब्बल ५०-६० टक्क्यांनी घटली आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज १७०-२२० ट्रक कांद्याची आवक होत असते. परंतु, सध्या मार्केट यार्डात केवळ ७०-८० ट्रक कांद्याची दररोज आवक होत आहे. त्यात हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. त्याचे परिणाम आता मार्केटमध्ये दिसत असल्याचे रितेश पोमण यांनी सांगितले. सध्या हळवी कांद्यााचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे या कांद्यााची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा दरात तेजी सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असून कांद्याचे दर आणखी वाढू शकतात.

हळवी कांद्याचा हंगाम फेब्रुवारी अखेर पर्यंत संपतो व याच दरम्यान गरवी (उन्हाळी कांदा) कांद्यााचा हंगाम सुरू होतो. सध्या गरवी कांद्याची आवक अल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजारात होणारी गरवी कांद्यााची आवक कमी आहे.

सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्यााला ३०० ते ३४० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्यााचे उत्पादन उच्चांकी झाले होते. यंदाच्या वर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे कांद्यााचे मोठे नुकसान झाले. कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज १७० ते २२० ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात होता. .पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्यााची आवक होत आहे.

--

आवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचे रोपही मिळेना

यंदा संपूर्ण वर्षे लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात ऑक्टोबर, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या आवकाळी पावसामुळे दिवाळीत काढणीला आलेले कांदा पिक वाय गेले, तर उन्हाळी कांद्याच्या रोपाला ही फटका बसला. यामुळे यंदा हजारो शेतकऱ्यांना कांद्याचे रोप देखील मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. आवकाळी पावसामुळे कांदा लागवडीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. यामुळेच सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असून, दर वाढत आहेत.

- नवनाथ शेळके, कांदा उत्पादक शेतकरी जुन्नर