शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
2
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
3
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
4
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
5
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
6
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवयाला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
7
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
8
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
9
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
10
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
11
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
12
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
13
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
14
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
15
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
16
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
17
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
18
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
19
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?

कांद्याचे दर आणखी वाढणार; आवक ६० टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने सध्या राज्यातील सर्वच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक तब्बल ५०-६० टक्क्यांनी घटली आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात दररोज १७०-२२० ट्रक कांद्याची आवक होत असते. परंतु, सध्या मार्केट यार्डात केवळ ७०-८० ट्रक कांद्याची दररोज आवक होत आहे. त्यात हळवी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसांत कांद्याच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

यंदा ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्यात बहुतेक सर्व ठिकाणी आवकाळी पावसाने हाहाकार माजवला. याचा सर्वात मोठा कांदा उत्पादक शेतक-यांना बसला. त्याचे परिणाम आता मार्केटमध्ये दिसत असल्याचे रितेश पोमण यांनी सांगितले. सध्या हळवी कांद्यााचा (लाल कांदा) हंगाम अंतिम टप्प्यात आल्यामुळे या कांद्यााची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. आवकेच्या तुलनेत मागणी जास्त असल्याने कांदा दरात तेजी सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो कांद्यााची विक्री ५० ते ६० रुपये दराने केली जात आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असून कांद्याचे दर आणखी वाढू शकतात.

हळवी कांद्याचा हंगाम फेब्रुवारी अखेर पर्यंत संपतो व याच दरम्यान गरवी (उन्हाळी कांदा) कांद्यााचा हंगाम सुरू होतो. सध्या गरवी कांद्याची आवक अल्प प्रमाणात सुरू असल्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारात कांद्यााचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बाजारात होणारी गरवी कांद्यााची आवक कमी आहे.

सध्या घाऊक बाजारात दहा किलो कांद्यााला ३०० ते ३४० रुपये असा दर मिळाला आहे. गेल्या वर्षी गरवी कांद्यााचे उत्पादन उच्चांकी झाले होते. यंदाच्या वर्षी झालेल्या अवेळी पावसामुळे कांद्यााचे मोठे नुकसान झाले. कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाल्याने लागवडीवर मोठा परिणाम झाला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात दररोज १७० ते २२० ट्रक कांदा विक्रीस पाठविला जात होता. .पुणे, नाशिक, वाशी या महत्त्वाच्या बाजार आवारात पुणे जिल्हा, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तसेच नाशिक परिसरातून हळवी कांद्यााची आवक होत आहे.

--

आवकाळी पावसामुळे यंदा कांद्याचे रोपही मिळेना

यंदा संपूर्ण वर्षे लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात ऑक्टोबर, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या आवकाळी पावसामुळे दिवाळीत काढणीला आलेले कांदा पिक वाय गेले, तर उन्हाळी कांद्याच्या रोपाला ही फटका बसला. यामुळे यंदा हजारो शेतकऱ्यांना कांद्याचे रोप देखील मिळण्यासाठी अनेक अडचणी आल्या. आवकाळी पावसामुळे कांदा लागवडीचा हंगाम लांबणीवर पडला आहे. यामुळेच सध्या बाजारात कांद्याची आवक कमी असून, दर वाढत आहेत.

- नवनाथ शेळके, कांदा उत्पादक शेतकरी जुन्नर