शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

कांदा शेतकऱ्यांना रडविणार

By admin | Updated: October 10, 2014 06:24 IST

दिवाळीत कांद्याला ‘अच्छे दिन येतील’ या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला

सोमेश्वरनगर : दिवाळीत कांद्याला ‘अच्छे दिन येतील’ या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून कांदा साठवून ठेवला. मात्र, दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीही कांद्याचे दर वाढत नसल्याचे चित्र आहे. बाजारात कांद्याला उठाव नसल्याने, ऐन सणासुदीला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. लोणंद (ता. खंडाळा) येथे आज सहा हजार पिशव्यांची आवक झाली होती. प्रतवारीनुसार कांद्याला सध्या ६०० रुपयांपासून १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सरासरी हा दर ९०० ते १००० रुपये मिळाला. त्यातच पावसामुळे बराच खराब कांदा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा दर खर्चाच्या तुलनेत समाधानकारक नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दर वर्षी ३१ आॅगस्टपर्यंत संपणारा साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून नवीन कांद्याची आवकही वाढणार आहे. मात्र, आवक एवढ्या प्रमाणावर नाही. तरीही कांद्याचे भाव वाढत नाहीत. केंद्र सरकारने एकीकडे कांद्याच्या निर्यात मूल्यात वाढ केली, तर दुसरीकडे कांदा आयातीवरील निर्बंध आणखी कमी करून आयातही केली. त्यामुळे कांद्याच्या देशांतर्गत बाजारभावाला लगाम घालता गेला. कांद्याचे सध्याचे दर पाहता, ग्राहक सुखावला आहे. मात्र, कांद्याचे घसरलेले भाव उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत नवीन कांद्याची आवक वाढल्यास, भाव अजूनही कमी होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने जुलैमध्ये महागाई आटोक्यात आणण्यासाठी कांद्याला जीवनावश्यक वस्तू कायद्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कांद्याच्या साठवणुकीवर मर्यादा आली. कांद्याची साठेबाजी करून काळाबाजार करणाऱ्यावर अटकाव बसला. याशिवाय कांद्याचे मूल्य ३०० डॉलरवरून ५०० डॉलर केले. यामुळे कांद्याचे भाव २५०० हजार रुपयांच्या आसपास राहिले. मात्र, मध्यंतरी कांद्याची आवक कमी झाली. त्यामुळे सरकारने कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव पुन्हा खाली आले. (वार्ताहर)