शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वर्षा विहारासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू; एक जण वाहून गेला, दोघे बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 23:11 IST

सकाळी १०.३० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले.

तळेगाव दाभाडे- वर्षा विहारासाठी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या चार महाविद्यालयीन युवकांपैकी दोघेजण वाहून गेले. तर दोघेजण बचावले. एका युवकाचा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासन ,वन्यजीव रक्षक मावळ,शिवदुर्गमित्र लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

अनिकेत वर्मा (वय १७) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. अशोक गुलाब चव्हाण (वय१७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवार(दि.२४) रोजी सकाळी चिंचवड येथील श्रीमती गेंदेबाई ताराचंद चोपडा ज्युनियर कॉलेज मधील ८ते ९मित्र वर्षा विहाराचा आनंद लुटण्यासाठी कुंडमळा येथे आले होते. हे सर्व जण कॉलेजला दांडी मारून लोकलने बेगडेवाडी येथे उतरले. त्यानंतर त्यांनी सर्वांनी पायी कुंडमळा गाठला.त्यातील चौघे पाण्यात उतरले. त्यातील दोघे जण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेले.

सकाळी १०.३० पासून ते रात्री ७ वाजेपर्यंत ही शोध मोहीम सुरु होती. अथक प्रयत्नानंतर अनिकेत वर्मा या युवकाचा मृतदेह शोधण्यात पथकास यश आले. अशोक गुलाब चव्हाण (वय१७, रा. चिंचवड) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व त्यांचे सहकारी तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, शिवदुर्ग मित्रचे सचिन सुनील गायकवाड,भास्कर माळीमामा,गणेश ढोरे, गणेश निसाळ, विनय सावंत, गणेश गायकवाड, विकी दौडकर, अविनाश कार्ले, शुभम काकडे, निनाद काकडे, वैभव वाघ, सागर कुंभार , रतन सिंग, योगेश दळवी , सिध्देश निसाळ महेश मसणे, राजेंद्र कडू, प्रशांत शेडे, सागर भेगडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषचे निरंजन भेगडे, रियाज मुलाणी, गणेश जावळेकर , शुभम काळोखे , धीरज शिंदे, अक्षय घोडेकर यांनी अथक प्रयत्न केले.

अंधार पडल्याने रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. शुक्रवारी (दि.१०) सकाळी नऊ वाजता पुन्हा ही शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने व नीलेश गराडे यांनी सांगितले. (कोट) कुंडमळा येथील रांजणखेळगे पाहताना पाण्यात उतरू नये. पाण्याचा प्रवाह प्रचंड असून अनेक ठिकाणी निसरडे झाले आहे. त्यामुळे पाय घसरून अपघात होऊ शकतो. आपला जीव महत्त्वाचा आहे. वर्षा विहाराचा आनंद लुटताना नियमांचे पालन करावे. - निलेश गराडे संस्थापक: वन्यजीव रक्षक मावळ